
देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल –
दरम्यान काँग्रेसच्या टीकेवर भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, अटल सेतूला कोणताही तडा गेलेला नाही, तसेच अटल सेतूला कोणताही धोका नाही. हे चित्र जवळच्या रस्त्याचे आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, काँग्रेसने खोट्याचा आधार घेऊन एक लांबलचक योजना आखली आहे. निवडणुकीच्या वेळी संविधान बदलण्याच्या चर्चा, निवडणुकीनंतर फोनवरून ईव्हीएम अनलॉक आणि आता अशा खोट्या अफवा. मात्र, देशातील जनताच या ‘तडा’ योजनेला आणि काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा पराभव करेल.



