
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पोहोचताच विश्वजित कदम आणि विशाल पाटील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. सांगलीच्या उमेदवारीवरुन ठाकरे आणि विश्वजित कदम, विशाल पाटील यांच्यात बराच वाद रंगला होता. याच पार्श्वभूमीवर मतभेद दूर करण्यासाठी सांगलीतील हे दोन काँग्रेस नेते मातोश्रीवर जाणार आहेत.







