मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश? बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा भाजप-संघाचा प्रयत्न

0
13
मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश? बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा भाजप-संघाचा प्रयत्न


प्रा. गायकवाड पुढे म्हणाल्या की, भाजपा-आरएसएस देशाची घटना बदलून देशात मनुस्मृती लागू करू पाहत आहेत हे उघड आहे. लोकसभेत ४०० जागांच्या बहुमतासह सत्ता मिळाली की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार अशी जाहीर भाषा भाजपच्या नेत्यांनी केली आहे. आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जाहीर झालेला महाराष्ट्र राज्याच्या शालेय अभ्यासक्रम आराखड्यात (एससीएफ) मूल्ये आणि स्वभाववृत्ती या घटकाची सुरुवात मनुस्मृतीतील श्लोकाने करण्यात आली आहे. मनूस्मृतीमुळे वर्णव्यवस्था निर्माण केली, बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे पाप केले, मनूस्मृतीमध्ये महिलांना समाजात दुय्यम स्थान देण्यात आले आहे असल्याचे गायकवाड म्हणाल्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीला आपल्या हातांनी जाळले होते. त्याच मनुस्मृतीचा अभ्यास शाळकरी विद्यार्थांनी करायचा का, असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे.



Source link