Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशLoksabha Election 2024 | ४०० पारचा संकल्प अवघड पूर्ण करणे अवघड; पंतप्रधान...

Loksabha Election 2024 | ४०० पारचा संकल्प अवघड पूर्ण करणे अवघड; पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाजपच्या नेत्याचे पत्र, पत्रातून व्यक्त केली नाराजी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

४०० पारचा संकल्प अवघड पूर्ण करणे अवघड; पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाजपच्या नेत्याचे पत्र, पत्रातून व्यक्त केली नाराजी

लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला पार पडले आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Loksabha Election) कानपूर लोकसभा (Kanpur Loksabha) जागेसाठी चौथ्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला पार पडले आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Loksabha Election) कानपूर लोकसभा (Kanpur Loksabha) जागेसाठी चौथ्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. भाजपकडून (BJP ) कानपूरच्या जागेवर नव्या चेहऱ्याला उमेदवारी देण्यात आली आहे. रमेश अवस्थी यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपकडून रमेश अवस्थी यांना तिकीट मिळाल्यापासून ते चांगलेच चर्चेत आहेत.

सध्या भाजपमध्ये अनेक नवीन कार्यकर्त्यांची नावे समोर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यावर आता कानपूरमधील भाजपचे माजी उपाध्यक्ष, विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि बजरंग दलाचे माजी राष्ट्रीय संयोजक, दिग्गज नेते प्रकाश शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना पत्र लिहत उमेदवाराच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे, ४०० पारचा संकल्प पूर्ण करणे कठीण आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments