
इलेक्टोरल बॉन्ड योजनेचे कौतुक करताना पंतप्रधान मोदींनी म्हटले की, इलेक्टोरल बॉन्ड योजनेमुळे समजले आहे की, कोणत्या कंपनीने पैसे दिले? व कोणत्या पक्षाला दिले. पैसा कोठे दिला व किती दिला?या प्रश्नांची उत्तर आता मिळत आहेत, जे आधी शक्य नव्हते. त्यामुळे मला वाटते की, जेव्हा विरोधक प्रमाणिकपणे याचा विचार करतील तेव्हा त्यांना याचा पश्चाताप होईल. जे लोक डेटा पब्लिक झाल्यामुळे टीका करत आहेत, त्यांना भविष्यात पश्चाताप होईल.







