
राहुल गांधींनी केला आश्वासनांचा वर्षाव
यूपीए सरकारनं आणलेला जमीन अधिग्रहण कायदा भाजप सरकारनं कमकुवत केला आहे, सत्तेत आल्यास पुन्हा हा कायदा मजबूत केला जाईल. जातनिहाय जनगणना केली जाईल, शेतमालाला एमएसपीचा कायदा लागू करणार, ज्या भागात आदिवासींची ५० टक्के लोकसंख्या आहे, तिथं सर्व निर्णय घेण्याचा अधिकार आदिवासींना दिला जाईल, ६ व्या शेड्युलमध्ये त्याचा समावेश केला जाईल, असा शब्दही राहुल गांधी यांनी यावेळी दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांचीही यावेळी भाषणं झाली.





