
मानकर यांनी सांगितले की,किनाऱ्याला पार्क केलेल्या या बोटीची कर्मचार्यांनी दोरी काढली त्यामुळे बोट समुद्रात वाहून गेली. आग लागल्यानंतर आम्ही अग्निशमन दलाला फोन केला,मात्र भर समुद्रात बोटीला आग लागल्याने त्यावर नियंत्रण मिळवणं आव्हानात्मक होतं.बोटीत भरपूर इंधन असल्यानं बराच वेळ आग धुमसत होती. दुसर्या यॉट चार्टर कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की आग विझवण्यास कोणीही पुढे आले नाही. कारण बोट समुद्रात पेटली होती. व ही एक धोकादायक स्थिती होती.




