Bangalore Stampede: ‘सत्ताधाऱ्यांना दोष देता कामा नये..’ बंगळुरूतील मृत्यूतांडवावर BCCI कडून दोन टोकाच्या प्रतिक्रिया

0
1
Bangalore Stampede: ‘सत्ताधाऱ्यांना दोष देता कामा नये..’ बंगळुरूतील मृत्यूतांडवावर BCCI कडून दोन टोकाच्या प्रतिक्रिया


Bangalore Stampede: आयपीएलच्या 18 (IPL 2025) व्या हंगामाचं जेतेपद मिळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघावर, संघातल्या प्रत्येक खेळाडूवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. इथं संघ विजयी होतो तोच 12 तासांच्या आतच बंगळुरूच्या (Chinnaswamy Stadium stampede) चिन्नास्वामी स्टेडियममध्ये वियजोत्सव साजरास करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि इथं संघातील खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी म्हणून लाखोंच्या संख्येनं चाहत्यांनी गर्दी केली. पाहता पाहता गर्दी इतकी वाढली, की तिथं असणाऱ्या पोलीस दलालासुद्धा या गर्दीवर नियंत्रण ठेवणं आव्हानाजचं ठरताना दिसलं. 

स्टेडियमच्या आतमध्ये आनंदोत्सवाला सुरुवात झालेली असतानाच स्टेडियमबाहेर मात्र मृत्यूचा तांडव सुरू झाला होता. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या या भयंकर चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 11 जणांनी प्राण गमावले, तर अनेक क्रिकेटप्रेमी गंभीररित्या दुखापतग्रस्त झाले. बीसीसीआय आणि कर्नाटक सरकारपर्यंत ही खबरबात पोहोचताच त्यांनी तातडीनं या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेवर BCCI च्या वतीनं भूमिका मांडली. सैकिया यांनी बंगळुरूत झालेली ही घटना अचतिशय दु:खद असल्याचं म्हटलं. 

‘वास्तविक ही घटना अतिशय दुर्दैवी असून, अशा प्रकारच्या अमाप लोकप्रियतेची नकारात्मक बाजू यातून यमोकर आली आहे. चाहते त्यांच्या आवडच्या खेळाडूंप्रती भावनिक नात्यानं पाहतात यात शंकाच नाही. मात्र आयोजकांनी इथं अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता होती. या दुर्घटनेमध्ये ज्यांनी प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबीयांचं मी सांत्वंन करतो आणि जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी अशी प्रार्थना करतो’, असं ते म्हणाले. 

सैकिया यांनी सदर दुर्घटनेमध्ये चूक तर नक्की झाली आहे असं म्हणत आयपीएलच्या हंगामानातर अशा निराशाजनक घटना घडणं ही बाब अत्यंत वाईट असल्याचं म्हणत दु:ख व्यक्त केलं. 

BCCI उपाध्यक्ष म्हणाले… 

बंगळुरूमध्ये उसळलेली प्रचंड गर्दी आणि त्यानंतरची चेंगराचेंगरीची दुर्घटना पाहता बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी चिंतेचा सूर आळवत म्हटलं, ‘असं कोणत्याही राज्यात होऊ शकतं आणि यासाठी सत्ताधारी पक्षाला निशाण्यावर घेऊ नये. मुळात अशा दुर्घटनेचं राजकारण व्हायला नको. भाजपशासित राज्यात असं काही घडत असेल तर, पक्षाला याचा दोष देता कामा नये. प्रत्यक्षात तिथं गर्दी जास्त होती. मी स्वत: बंगळुरूच्या संघ व्यवस्थापकांशी संवाद साधला असून, त्यांनाही इतकी गर्दी अपेक्षित नव्हती आणि त्यातच चेंगराचेंगरीच्या घटनेनं परिस्थिती आणखी चिघळली. यादरम्यान मृतांच्या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत देण्याचाच प्रयत्न असेल.’

नेमकी कधी झाली चेंगराचेंगरी? 

आरसीबीच्या विक्ट्री परेडमध्ये सहभागी होण्यासाठी चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच ही घटना घडली. जिथं असंख्य चाहत्यांनी स्टेडियमच्या विविध प्रवेशद्वारांतून मैदानात जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी परिस्थिती इतकी चिघळली की अनेक नागरिकांमध्ये प्रचंड तणाव आणि अस्वस्थतेसह भीतीची लाट दिसून आली. काहींना प्रकृती अस्वास्थ्यामुळं पोलिसांनी तातडीनं रुग्णालयात दाखल करत मदतकार्य सुरू केलं आणि नागरिकांना घरी परतण्याचं आवाहन केलं. मात्र तोपर्यंत जे व्हायचं ते घडूनच गेलं होतं. 





Source link