फलटण :- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आज आणि उद्या मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये.
तालुका प्रशासनातर्फे सूचित करण्यात आले आहे की, कुठेही आपत्तीजनक स्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, जेणेकरून आवश्यक ती मदत वेळेवर पोहोचवता येईल.
नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे व सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.