नितीन नबीन यांचा कॉलम: ‎‎‎‎‎‎‎‎विकसित भारत ही केवळ घोषणा नव्हे संकल्प‎

0
1
नितीन नबीन यांचा कॉलम:  ‎‎‎‎‎‎‎‎विकसित भारत ही केवळ घोषणा नव्हे संकल्प‎




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने‎विश्वास, विकास आणि जनकल्याणाला समर्पित आपली‎12 वर्षे पूर्ण केली आहेत. ‘संकल्पातून सिद्धी’चा हा‎गौरवशाली काळ भारताचा विकास, सुरक्षा, आर्थिक‎सक्षमीकरण आणि जागतिक प्रतिष्ठेतील अभूतपूर्व वाढीचा‎साक्षीदार राहिला आहे. काँग्रेस देशाला अनिश्चितता,‎भ्रष्टाचार आणि कमकुवत नेतृत्वाचा वारसा देऊन गेली‎होती, पंतप्रधान मोदींनी भारताला आत्मविश्वास, सुशासन‎आणि विकासाची नवी ओळख दिली आहे. काँग्रेससाठी‎राजकारणाचा अर्थ वर्षानुवर्षे कुटुंबाचा वारसा वाचवणे हाच‎राहिला, तर पंतप्रधान मोदींसाठी राजकारण हे- ‘कुटुंब‎नाही, राष्ट्र प्रथम’ आणि ‘सत्ता नाही, सेवा प्रथम’ असा मार्ग‎राहिला आहे.‎ आपण जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचा इतिहास‎पाहिला तर त्यांच्या यशामागे जो एक मूलमंत्र दिसून येतो, तो‎आहे त्या राष्ट्राचे ‘सामूहिक स्वप्न’. भारताच्या संदर्भात वर्ष‎2014 मध्ये पहिल्यांदाच 140 कोटींच्या विशाल जनतेला‎सामूहिक चेतनेच्या एका सूत्रात बांधण्याचे ऐतिहासिक कार्य‎पंतप्रधान मोदींनी केले. देशाला पहिले असे नेतृत्व मिळाले‎आहे, जे एका ‘प्रधान सेवक’च्या भावनेने ‘सबका साथ,‎सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’चा‎महासंकल्प घेऊन निरंतर पुढे जात आहे. 2014 मध्ये‎पंतप्रधानांनी आधी राष्ट्राला एक ‘सामूहिक विचार’ दिला,‎नंतर जनविश्वासाच्या बळावर त्या विचाराला ‘सामूहिक‎संकल्प’मध्ये बदलले आणि आज तोच संकल्प ‘विकसित‎भारत’च्या रूपात ‘सामूहिक स्वप्न’चे रूप धारण करून‎चुकला आहे.‎ या महापरिवर्तनाची सुरुवात पायाभूत सुविधांच्या‎अभूतपूर्व क्रांतीने झाली. 2014 पूर्वी देश पायाभूत सुविधांच्या‎कमतरतेशी झगडत होता. आज तळागाळातील बदलाचा‎परिणाम असा आहे की 12 कोटींहून अधिक शौचालये‎बांधली गेली, 100% विद्युतीकरण झाले, एक्स्प्रेस-वे नेटवर्क‎7 पटीने वाढले आणि विमानतळे 74 वरून 160 पेक्षा जास्त ‎‎झाली. हा काळ मानसिक गुलामगिरीतून मुक्ती आणि ‎‎वास्तविक ‘डी-कॉलोनायझेशन’चा साक्षीदार आहे. ‎‎लोककल्याण मार्ग, कर्तव्य पथ आणि सेवा तीर्थचे‎नामकरण आणि योगाचा जागतिक प्रसार याचा पुरावा आहे. ‎‎एक काळ असा होता, जेव्हा देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने ‎‎तत्कालीन 54 कोटींच्या लोकसंख्येला ओझे मानले होते,‎पण आज पंतप्रधान मानतात की हेच 140 कोटी देशवासी ‎‎भारताच्या विकासगाथेचा सर्वात मजबूत दुवा आहेत. याच ‎‎विचाराने कलम 370 कायमचे रद्द केले. अंतर्गत सुरक्षेच्या ‎‎आघाडीवर नक्षलवाद आणि दहशतवादाविरुद्ध ‘झीरो ‎‎टॉलरन्स’चे धोरण अवलंबले गेले. कोरोनाकाळात 220 ‎‎कोटींहून अधिक मोफत लस डोस आणि ‘लस मैत्री’ने ‎‎जागतिक स्तरावर भारताच्या क्षमतेची ओळख करून‎दिली.‎ आजचा तरुण ‘जॉब सीकर’ नाही, तर ‘जॉब गिव्हर’‎बनत आहे. 2 लाखांहून अधिक स्टार्टअप्स आणि 125 पेक्षा ‎‎जास्त युनिकॉर्न्ससोबत भारत मॅनपॉवरकडून ‘मॅन्युफॅक्चरिंग ‎‎पॉवर’कडे वाटचाल करत आहे. याचप्रमाणे देश ‘वुमेन‎डेव्हलपमेंट’च्या पुढे जाऊन ‘वुमेन लेड डेव्हलपमेंट’चा‎साक्षीदार बनत आहे, जिथे 3 कोटींहून अधिक ‘लखपती‎दीदी’ आणि सुरक्षा दलांमध्ये महिला अधिकाऱ्यांची 4 पट‎वाढ नारीशक्तीचे स्वावलंबन दर्शवते. मोदी सरकारने‎मातृशक्तीला सन्मान, सुरक्षा, स्वाभिमान आणि भागीदारी‎देण्यामध्ये ऐतिहासिक यश संपादन केले आहे. गरीब‎कल्याणाच्या क्षेत्रात, विविध योजनांनी वंचितांच्या‎‘विशियस सायकल’ (दुष्टचक्र) ला ‘वर्च्युअस सायकल’‎(गुणात्मक चक्र) मध्ये बदलले आहे, ज्यामुळे 25 कोटी‎लोक दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले आहेत. 4 कोटी पक्की घरे,‎60 कोटी नागरिकांना आयुष्मान कवच आणि पीएम मुद्रा‎योजनेअंतर्गत 40 लाख कोटी रुपयांचे विनातारण कर्ज‎याचा आधार बनले. डिजिटल क्रांतीच्या क्षेत्रात, ‘1‎रुपयापैकी फक्त 15 पैसे पोहोचण्याच्या’ जुन्या काळाला‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎संपुष्टात आणून डीबीटीच्या माध्यमातून 51 लाख कोटी रुपये‎थेट लाभार्थींच्या खात्यात पाठवले गेले.‎जनधन-आधार-मोबाइल (जॅम) ट्रिनिटी आणि‎यूपीआयच्या माध्यमातून आज ₹314 लाख कोटींचा‎वार्षिक डिजिटल व्यवहार होत आहे, जो जागतिक स्तरावर‎49% आहे. निसर्गाप्रति कटिबद्धता दर्शवत भारताने स्वच्छ‎भारत अभियान, एक पेड माँ के नाम आणि सोलार‎कॅपेसिटीला 2.6 जीडब्ल्यू वरून 110+ जीडब्ल्यूपर्यंत‎पोहोचवून ग्रीन अर्थचा संकल्प सिद्ध केला आहे.‎ पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आज देशाच्या‎सीमावर्ती भागांना सर्वोच्च प्राधान्य मिळाले आहे.‎कधीकाळी देशाचे शेवटचे गाव म्हटले जाणारे हे भाग आज‎भारताचे पहिले गाव म्हणून नवी ओळख मिळवून चुकले‎आहेत. यासोबतच आज भारताच्या लष्करी क्षमतेत‎अभूतपूर्व वाढ झाली आहे आणि आपली सैन्यदले‎अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहेत. 500 वर्षांच्या‎प्रतीक्षेनंतर भव्य राम मंदिराचे निर्माण, काशी विश्वनाथ धाम‎आणि महाकाल महालोकचा जीर्णोद्धार हे आपल्या‎सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या त्या सभ्यतागत चेतनेचे पुनर्जागरण‎आहे, जे विकासही, वारसही या मूलमंत्राला पूर्ण सार्थकेने‎साकार करत आहे.‎ गेल्या 12 वर्षांत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात संपूर्ण‎देशाचा विचार करण्याचा ट्रेंडदेखील बदलला आहे. आज‎नव्या भारताचा कल असा आहे, जिथे आंत्रप्रेन्योर बनणे एक‎ट्रेंड आहे, कठोर परिश्रम करणे एक ट्रेंड आहे आणि‎व्होकल फॉर लोकलपासून ते मेक इन इंडियाचा अवलंब‎करणे प्रत्येक नागरिकाचा मूलमंत्र बनला आहे. हा असा‎काळ आहे, जिथे जलद विकासासोबतच आपल्या‎सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगणे हा एक ट्रेंड आहे.‎आज देशात स्पिरिचुअल टुरिझमची एक नवी लाट दिसत‎आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘राष्ट्र प्रथम’च्या‎भावनेसोबत एका सामूहिक संकल्पाने काम करणे हा‎देशाचा ट्रेंड बनला आहे. या सर्व सकारात्मक बदलांमागे‎पंतप्रधानांची भूमिका एका ट्रेंडसेटरची राहिली आहे, ज्यांनी‎या माध्यमातून आज संपूर्ण देशाला एकतेच्या एका मजबूत‎धाग्यात विणले आहे.‎ आज भारत केवळ अंतर्गतदृष्ट्या सशक्त होत नाहीये,‎तर जागतिक स्तरावरही एक महासत्ता म्हणून उदयास आला‎आहे. जेव्हा पंतप्रधानांना जगातील 32 देशांचा सर्वोच्च‎नागरी सन्मान प्राप्त होतो तेव्हा हा खऱ्या अर्थाने सनातन‎भारतीय विचार आणि 140 कोटी देशवासीयांच्या पुरुषार्थाचा‎सन्मान असतो. याच कारणामुळे आज विकसित भारत ही‎केवळ एक घोषणा नाही, तर पंतप्रधानांच्या दूरदर्शी‎विचारांचे फळ आहे, ज्याला देशवासीयांनी अढळ विश्वास‎आणि संकल्पित भावनेने आत्मसात केले आहे.‎ भारताचे सामूहिक स्वप्न…‎सरकारची ही 12 वर्षे जिथे सेवा, सुशासन‎आणि लोक-आकांक्षांच्या पूर्तीची राहिली‎आहेत, तिथेच पुढची 21 वर्षे विकसित‎भारताचे ध्येय साध्य करण्याचा प्रवास असेल.‎या अमृतकाळात सर्व देशवासी मिळून एका‎सशक्त, समृद्ध, सुरक्षित, स्वावलंबी, समर्थ‎आणि समरस भारताच्या ‘सामूहिक स्वप्न’ ला‎नक्कीच साकार करतील.‎



Source link