[ad_1]
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीत न भूतो न भविष्य असे जोरदार यश मिळवून राज्याच्या सत्तेची तचावी आपल्याकडेच ठेवली आहे. महायुतीच्या सुनामीत महाविकास आघाडी पालापाचोळ्याप्रमाणे वाहून गेली. विधानसभेच्या पराभवानंतर शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीपासून वेगळा होणार व मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. एक दिवस असा येईल की,उद्धव ठाकरे रात्री २वाजता आपल्या कुटूंबासह देश सोडून पळून जातील,,असे खळबळजनक वक्तव्य कदम यांनी केले आहे.
[ad_2]
Source link
