
ठाण्यातील कळवा परिसरातील खारेगाव टोल नाक्याजवळ मुंबई-नाशिक उड्डाणपुलाखालील रेतीबंदर खाडीत ६२ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले, मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेकडून देण्यात आली आहे.








