
मुंबई : राज्यात तब्बल साडेचार हजार तलाठ्यांची भरती केली जणार आहे. यासाठी परीक्षा सुरू आहे. या परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा होती. दरम्यान, आज ऑनलाइन परीक्षेदरम्यान, विद्यार्थ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. परीक्षा सुरू व्हायच्या सुरवातीलाच सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी ताटकळले. राज्यातील नागपूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर आदी केंद्रांवर हा बिघाड झाल्याने गोंधळ उडाला.



