
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून रविंद्र महाजनी ओळखले जायचे. अतिशय हँडसम अभिनेता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाच्या काही महिनाभरातच त्यांची पत्नी माधवी यांनी ‘चौथा अंक’ हे आत्मचरित्र पुस्तक प्रकाशित केले. मात्र प्रकाशित होताच हे पुस्तक चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचे कारण म्हणजे रविंद्र महाजनी यांच्या आयुष्यातील काही वादळी खुलासे.








