Friday, August 7, 2026
Home Blog Page 623

वेब वॉच: जेव्हा गंभीर विषयातील ‘पाणी’च निघून जाते…

0
वेब वॉच:  जेव्हा गंभीर विषयातील ‘पाणी’च निघून जाते…


सुहास किर्लोस्कर2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

दिग्दर्शक म्हणून कथेतील संघर्ष दाखवण्याऐवजी आदिनाथ कोठारेंनी स्वतःचा नायक केंद्रस्थानी ठेवल्याने या सिनेमात काही ‘पाणी’च राहिले नाही.

महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाण्याचा ज्वलंत प्रश्न भेडसावतो. जमिनीमध्ये पाणी मुरवण्यासाठी गावागावांत चर खोदण्याचे काम पाणी फाउंडेशनने सुरू केले. ते करताना श्रमदानासाठी ग्रामस्थांना एकत्र आणणे, त्यांच्यात या नवीन संकल्पनेविषयी विश्वास निर्माण करतानाच त्यांना एकजुटीने या एका उद्देशासाठी प्रेरित करण्याचे काम या गावांमध्ये करण्यात आले. ‘पाणी’ हा सिनेमा म्हणजे त्यातीलच एका गावकरी युवकाची कहाणी. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा नुकताच प्राइमवर उपलब्ध झाला आहे.

अशा संकल्पनेवरील सिनेमासाठी पटकथाही सशक्त असायला हवी. नितीन दीक्षित यांनी अशी पटकथा उभी केली आहे. नागरदवाडीतील पाण्याच्या समस्येमुळे गावकरी असलेल्या नायकाशी लग्न करण्यास नायिका नकार देते आणि त्यामुळे नायक जिद्दीने पेटून उठतो. हे कथानक सत्यघटनेवर आधारित आहे. मग गावकऱ्यांचा विरोध, गावातील राजकारणी लोकांनी ठरल्याप्रमाणे काम बंद करण्यासाठी काही गुंड पाठवणे, ते सापडणे आणि त्यातून नायकाचे नेतृत्व गावकऱ्यांनी स्वीकारणे या चिरपरिचित क्रमाने ही पटकथा पुढे सरकते. दिग्दर्शक आदिनाथ कोठारेंनी कथेतील संघर्ष प्रभावीपणे पुढे आणून हा सिनेमा चित्रित न करता स्वतःच साकारलेला नायक सतत दाखवण्याचा मार्ग पत्करल्याने सिनेमा अपेक्षित परिणाम साधत नाही.

अर्जुन सोरते यांची सिनेमॅटोग्राफी ही सिनेमाची त्यातल्या त्यात सर्वात उजवी बाजू. निव्वळ अर्थपूर्ण फ्रेम्स, बोलका कॅमेरा अनुभवण्यासाठी हा सिनेमा बघावा. चित्रपटाचा ओपनिंग सीन कमालीच्या कौशल्याने चित्रित केल्यामुळे अपेक्षा वाढतात आणि पुढेही या सिनेमॅटोग्राफीने अशीच कमाल दाखवली आहे. फोकस-आउट ऑफ फोकसचा खेळ मराठी सिनेमांमध्ये यापूर्वी इतक्या प्रभावीपणे फार कमी प्रमाणात बघण्यास मिळाला आहे.

आदिनाथ कोठारे यांचा हनुमंत केंद्रे हा गावातील युवक पटवून घ्यावा लागतो. सिनेमामध्ये ‘नायक’ आदिनाथ कोठारे नसलेले प्रसंग जवळपास नाहीतच. गावातला हा युवक सर्वांना एकत्र आणतो. पुरुषांना एकत्र आणणारा युवक तोच आणि स्त्रियांची एकजूट करणाराही तोच. गावकरी एकत्र आले, तरी विहीर खणून पाणी पहिल्यांदा कोणाला सापडते, या प्रश्नाचे उत्तरही एकच. ऋचा वैद्य यांनी ‘सुवर्णा’ ही नायिका साकारताना एकाच चेहऱ्याने वावरण्याची खबरदारी घेतली आहे. नायिकेच्या मेकअपमध्येही अनेक प्रसंगांत विसंगती दिसतात. कधी तिला सुंदर, तर कधी सामान्य दाखवले आहे. त्यामध्ये एकसमान धागा किंवा विचार दिसत नाही. सुबोध भावे प्रत्येक मराठी चित्रपटात दिसत असले, तरी मराठी चित्रपट यशस्वी ठरण्याचा तो फॉर्म्युला नाही, हे सिद्ध झाले आहे.

शिवाय, ते सगळीकडे एकाच पद्धतीचा अभिनय करतात, त्यातही वैविध्य नाही. ‘नाबार्ड’च्या अधिकाऱ्याचे काम रजत कपूर यांनी केले आहे. विशेष म्हणजे, सुबोध भावे आणि रजत कपूर सिनेमाच्या सुरूवातीनंतर कथेतून गायब झाले आहेत. गिरीश जोशींनी साकारलेले प्रमोद हे प्रारंभी नायकाला मार्गदर्शन करताना दिसतात, पण मराठी नायक चतुर आणि चतुरस्त्र असल्यामुळे पटकथा लेखकाने हा मार्गदर्शक पुन्हा चित्रपटात दिसणार नाही, याची जणू खबरदारी घेतली आहे.

या सिनेमाचा नायक आणि दिग्दर्शक स्वत: आदिनाथ कोठारेच आहेत. नायकाने पहार मारल्यावर सापडलेल्या पाण्याचा फवारा इतका मोठा आहे की, त्याच्या उंचीपेक्षाही उंच तुषार निरंतर उडत राहतात आणि त्या पाण्यातून नायक विहिरीच्या काठावर उभ्या असलेल्या नायिकेकडे पाहतो! टीमवर्कचे महत्त्व दाखवण्याऐवजी सगळा बदल एकटा नायक घडवून आणतो आणि हे अविश्वसनीय वाटते. नागदरवाडीमध्ये पाणी सापडले असले, तरीही पटकथा लिहिताना, दिग्दर्शन करताना हा विषय पाण्यावर केंद्रित करण्याऐवजी नायकाच्या प्रेमावर केंद्रित केल्याने त्याचा प्रभाव पडत नाही. आणखी एक मराठी सिनेमा बघितला, एवढेच समाधान त्यातून मिळते. हनुमंत आणि सुवर्णा यांचे लग्न होते, ते त्याने केलेला पण पूर्ण केल्यामुळे, हे निर्विवाद. पण, त्याचे चित्रीकरण करताना अनेक शिलेदारांपैकी एक असे न दाखवता त्याला हिरो केले आहे.

पटकथा – संवाद लेखनासोबतच नितीन दीक्षित यांनी क्रिएटिव्ह डायरेक्टरची जबाबदारी सांभाळली आहे. परंतु, आदिनाथ कोठारेंनी नेमके काय दिग्दर्शन केले, हे शोधावे लागते. अर्थात दीक्षित यांनी लिहिलेल्या कथेचा विस्तार आदिनाथ यांनी केल्याचे श्रेयनामावली सांगते. अनमोल भावे यांचे ध्वनी संयोजन उत्तम. पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा विषय महाराष्ट्राच्या मातीतला आहे. पण, त्यावर प्रभावी सिनेमा झाला असता, तर तो गावोगावी दाखवून त्याद्वारे जनजागृती होऊ शकली असती, अशी खंत नंतर वाटत राहते.

(संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)



Source link

डायरीची पाने: पुषा आइतवारची गोष्ट

0
डायरीची पाने:  पुषा आइतवारची गोष्ट


इंद्रजित भालेराव8 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

पौषातल्या रविवारची सकाळ निसर्गाच्या रंग, गंध अन् आकारात रमवायची. ती मनाला विलक्षण वेगळ्या भावविश्वात न्यायची. कसला तरी उदात्त आनंद मिळवून द्यायची.

सध्या पौष महिना सुरू आहे आणि आज रविवारही आहे. पौष महिन्यातील रविवार विशेष समजला जातो. आमच्याकडं रविवारला आईतवार म्हणायचे. खरं तर हा सूर्याचा वार. रवी म्हणजे सूर्य आणि आदित्य म्हणजे देखील सूर्यच. त्याचं संस्कृत नाव आदित्यवार असंच आहे. त्या आदित्यवाराचंच बोलीत आईतवार झालं. पौष महिन्यातल्या रविवारी सूर्याची पूजा करतात. ती का करतात, ते नेमकं नाही सांगता येणार. असेल त्याचं काहीतरी कारण. पण, लहानपणी पौष महिन्यातील रविवारी सकाळी सकाळी या पुजेचं सामान गोळा करण्याचं काम माझ्याकडं असायचं. ते मला फार आनंददायक वाटायचं. एरवीही घरात अमावस्या, पौर्णिमा असेल आणि त्या दिवशी उटी, उपहार असेल, तर देवाला लागणारी फुलं गोळा करण्याचं काम माझ्याकडंच असे. त्यामुळं त्या दिवशी पहाटेच उठून जिथं कुठं फुलाची झाडं आहेत, तिथं जाऊन फुलं गोळा करण्याचं काम मी करायचो.

तेव्हा फार वेगळी अशी फुलं आमच्या गावात नव्हती. फुलाची कुठली झाडंही नव्हती. फक्त पांढऱ्या आणि तांबड्या रंगाची कण्हेरीची फुलं मात्र तीन – चार ठिकाणी मिळायची. असलीच तर कुणाच्या शेतातल्या बांधावर झेंडूची झाडं असायची. झेंडूचा गडद रंग आणि उग्र वास फार आवडायचा. बाकी बारा मैलात एक चमेलीचं झाडंही होतं. त्याचाही वेगळा गंध यायचा. जाई, जुई, शेवंती, मोगरा, गुलाब ही फुलांची नावंही आम्हाला माहीत नव्हती. कण्हेरीचं एक झाड दतराव बापूराव यांच्या ओढ्याकाठच्या झऱ्यावर होतं, बारा मैलातल्या कॅनॉलवरच्या बंगल्यावर काही झाडं होती. तिथून ही फुलं आणावी लागायची. पण, पौष महिन्यातील रविवारी या फुलांची फारशी गरज नसायची. असली तर चालायची आणि नसली तरी भागायचं.

पौष महिन्यातल्या रविवारी शेतात असलेली प्रत्येक गोष्ट पुजेला असली तरी चालायची. विशेषच वस्तू पाहिजे, असं या पुजेचं नसायचं. पण या पुजेसाठी हरभऱ्याचा डहाळा, वाळूक, बोरं, उसाचं टिपरू, करडईच्या रंगीत फुलांचा केशर अशा शेतातल्या गोष्टी आई हमखास आणायला सांगायची. इतरांच्या घरी पाटावर सूर्य काढून सूर्याची पूजा केली जात असे. सोनार कुटुंबातील माझा मित्र प्रभाकर याच्या घरी त्याची आई पाटावर सुंदर सूर्याचं चित्र काढून त्याची पूजा करायची. पण, आमच्या घरी सूर्य काढला जात नसे. आमचे जे महानुभावांचे देव देव्हाऱ्यात आहेत, त्यासमोरच ही सगळी पूजा केली जायची. खरं तर रविवारच्या या पुजेला सूर्याची पूजा म्हणून जास्त महत्त्व असायचं. पण, महानुभावेतर लोक जो जो सण साजरा करतात, त्यांच्या देवाची पूजा करतात, तो सण आपणही साजरा करायचा; मात्र आपल्याच देवाची पूजा करून, अशी महानुभाव अनुयायांची रीत असायची. त्यामुळं आमच्या घरी पुषा रविवारी आमच्याच देवाची पूजा केली जायची. पण, ती करण्याची पद्धत नेहमीसारखी नसायची. अन्य लोकांच्या घरी सूर्याच्या पुजेची जी पद्धत होती, त्या प्रकारेच ही पूजा केली जायची. पाटावर या सगळ्या वस्तू ठेवून त्यांना हळद-कुंकू वाहिलं जायचं.

हा सगळा पाटावर ठेवलेला रानमेवा आणि त्यावर वाहिलेलं हळदी-कुंकू, देवासमोर लावलेला तेलाचा दिवा किंवा फुलवात, अगरबत्ती हे सगळंच मोठं छान वाटायचं. पाहत राहावं वाटायचं. मांडलेली ही पूजा दिवसभर तशीच देवासमोर ठेवली जायची. संध्याकाळच्या वेळी ती उचलली जायची. इतका वेळ देवाच्या पुजेमध्ये असलेल्या या सगळ्या वस्तू खाण्याची आम्हाला परवानगी मिळायची. त्यामुळे पुजेतलं वाळूक, बोरं, उसाचं कांडं आम्हाला खायला मिळत. हरभऱ्याचा डहाळा खाण्यासारखा असेल, तर तोही आम्ही खायचो.

करडीच्या फुलाचे केशर मात्र खायच्या उपयोगाचे नसत. पण, ते डोळ्याला फारच अाल्हाददायक वाटायचे. मला करडीचं फुल खूपच छान वाटायचं. या सगळ्या वस्तू पाटावर मांडून त्यावर करडईच्या फुलाचे केशर पसरले, तरी ते हळदी-कुंकू लावल्यासारखं वाटायचं. कारण हे केशर जर्द लाल आणि गर्द पिवळ्या रंगाचे असायचं. बऱ्याचदा शेतातही हे केशर हातावर घेऊन मी त्याकडं पाहत राहायचो. या गोष्टी फार आनंददायक वाटायच्या. हरभऱ्याच्या झाडाला येणारी जांभळी फुलं, वाळकाच्या झाडाला येणारी पिवळी फुलं, ज्वारीच्या कणसावर येणारा पिवळा फुलोरा या सगळ्याच गोष्टी तळहातावर घेऊन बघत राहाव्यात, असं वाटायचं.

निसर्गानं या वस्तूंना दिलेले आकार, रंग आणि गंध विलक्षण वेगवेगळा असायचा. त्यामुळं पंचेंद्रियांना सुख मिळायचं. रंगानं डोळे निवायचे, गंधानं घ्राणेंद्रिय सुखावायचं, आकारानं मन प्रसन्न व्हायचं आणि मनातल्या मनात खूप आनंद वाटायचा. हे सगळं निसर्गाचं कौतुक आहे, याची तेव्हा जाणीव नसायची. हे काहीतरी विलक्षण आहे, असं मात्र वाटत राहायचं. त्या विलक्षणाकडं पाहात त्याचा अानंद अनुभवाचा. कधी कधी मी ही फुलं पुडीत बांधून ठेवायचो. काही दिवसानंतर त्या पुड्या उकलून पाहिल्या की, त्या फुलांचा रंग नष्ट झालेला असायचा, पण गंध मात्र मोहोळाच्या मधासारखा यायचा. जणू मधमाशा या फुलातून जो गंध नेत असत, तोच इथं साठलेला असायचा.

हरभऱ्याच्या झाडाचा आकार, त्याच्या फांदीचा आकार, त्याच्या पानाचा आकार हे सगळंच काही विलक्षण वाटायचं. ओल्या भाजीची चव भारी वाटायची. हरभऱ्याच्या झाडावर आलेली आंब आमच्या चोळण्याला लागायची आणि चोळण्याला रक्ताचा डाग पडल्यासारखं वाटायचं. त्यामुळं हरभऱ्याच्या पिकातून जाताना थंडीच्या दिवसात पायाला हरभरा झोंबला तरी चालेल, पण चोळणा वर करावा लागायचा. नाही तर त्या चोळण्याला पडलेले डाग नंतर कितीही साबण लावला तरी निघायचे नाहीत. पौष महिन्यातल्या या चार रविवारची सकाळ अशी मस्तपैकी निसर्गाच्या रंग, गंध अन् आकारात रमून जायला भाग पाडायची. ती मनाला विलक्षण वेगळ्या भावविश्वात न्यायची. कसला तरी उदात्त आनंद मिळवून द्यायची.

(संपर्कः inbhalerao@gmail.com)



Source link

माझ्या हिश्श्याचे किस्से: कैफ भोपालींची कमाल अमरोहींशी होती घनिष्ट मैत्री, केवळ त्यांच्या सिनेमांसाठीच लिहायचे गाणी

0
माझ्या हिश्श्याचे किस्से:  कैफ भोपालींची कमाल अमरोहींशी होती घनिष्ट मैत्री, केवळ त्यांच्या सिनेमांसाठीच लिहायचे गाणी


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी मी कमर जलालाबादी आणि आनंद बक्षी यांच्याविषयी लिहिले होते. त्यानंतर अनेकांनी मेसेज, मेलद्वारे तसेच व्यक्तिगत चर्चेतून, तुम्ही इतर गीतकारांबद्दलही लिहा, असे मला सुचवले. त्यामुळे मी विचार केला की, आपल्याच भोपाळ शहरातील उत्तम कवी, गीतकार आणि ‘चलो दिलदार चलो, चाँद के पार चलो..’ यासारखी अविस्मरणीय गाणी लिहिणाऱ्या कैफ भोपाली यांच्यापासूनच त्याची सुरूवात करावी.

मला आठवतंय, जेव्हा मी सुभाष घईजींचे सासरे अख्तर फारूखी साहेबांना भेटलो आणि त्यांना मी भोपाळचा आहे, असे सांगितले तेव्हा ते उभे राहिले अन् मला मिठी मारली. म्हणाले, ‘तू माझे प्रिय मित्र, शायर कैफ भोपाली यांच्या गावचा आहेस!’ त्यांनी मला पुढे सांगितले की, मी कमाल अमरोही साहेबांकडे प्रॉडक्शनमध्ये काम करायचो. कैफ साहेब गाणी लिहिण्यासाठी भोपाळहून यायचे, तेव्हा तिथे माझी ड्यूटी लागायची.

कमाल साहेब म्हणायचे, अख्तर, तू दुसरे कोणतेही काम करु नकोस. ऑफिस, स्टुडिओ सगळे विसरून जा. तुला फक्त एकच काम करायचेय, ते म्हणजे कैफ साहेबांची बडदास्त ठेवणे. त्यांच्यासाठी जेवणाची उत्तम व्यवस्था कर. रात्री त्यांना चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन जा. बस, फक्त त्यांना खूश ठेव. कारण कैफ साहेब मनमौजी स्वभावाचे होते आणि ते केवळ कमाल अमरोहींसाठीच गाणी लिहायचे.

माझी कैफ साहेबांसोबत चांगली मैत्री आहे, हे इंडस्ट्रीतील लोकांना समजल्यावर शंकर जयकिशन, मदन मोहन, सलिल चौधरी, अनिल विश्वास, बी. आर. चोप्रा, यश आनंद, रामानंद सागर असे त्यावेळचे मोठमोठे दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक मला म्हणायचे की, कैफ साहेबांसोबत आमची भेट घालून द्या, आम्हाला त्यांच्याकडून गाणी लिहून घ्यायची आहेत. पण, कैफ साहेब स्पष्ट नकार द्यायचे. ते म्हणायचे की, सिनेमांची गाणी लिहिणे हे माझे काम नाही. मी शायर आहे आणि कमाल माझा मित्र आहे, म्हणून फक्त त्याच्यासाठी गाणी लिहून देतो.

कमाल अमरोहींना कैफ साहेब अनेकदा थट्टेने म्हणायचे की, तू आपले नाव चुकीच्या पद्धतीने लिहितोस. तुझे नाव असायला पाहिजे कमाल अमरोहवी आणि लिहितो मात्र अमरोही. त्यावर कमाल साहेब हसून उत्तर द्यायचे, मी नेहमी काही तरी वेगळे करतो. त्यामुळे आपले नावही वेगळ्या पद्धतीनेच लिहितो.

अख्तर साहेबांनी मला सांगितले की, मद्य किंवा मद्यपींना कुणी नावे ठेवली तर कैफ साहेबांना वाईट वाटायचे. एकेदिवशी सायंकाळी काम संपले, अंधार पडू लागला होता. आम्ही सगळे परत निघण्यासाठी कमाल स्टुडिओच्या गेटवर उभे होतो. त्याचवेळी तिथे मळलेले, फाटलेले कपडे, विस्कटलेले केस अशा अवतारातील एक भिकारी आला. तो थेट कमाल साहेब आणि कैफ साहेबांजवळ आला. त्यांच्याकडे पाहून म्हणाला, ‘साहेब, खायला काही नाही. जेवायला थोडे पैसे द्या.’ तो हे बोलला आणि त्याचवेळी त्याच्या तोंडातून देशी दारुचा खूप घाण भपकारा आला.

कमाल साहेब त्याला फटकारत म्हणाले, ‘तुझ्याकडे खायला पैसे नाहीत, पण दारु प्यायला मात्र आहेत. दारुडा कुठला. चल, जा इथून.’ हे ऐकून कैफ साहेबांना वाईट वाटले आणि त्यांनी त्याचवेळी एक शेर ऐकवला…

शाइस्तगान-ए-शहर

मुझे ख्वाह कुछ कहें,

सड़कों का हुस्न है

मिरी आवारगी के साथ।

ही १९९१ मधली गोष्ट आहे. माझी लिखाणाची सुरूवात होत होती. साजिद नाडियादवालासाठी मी ‘चांद चकोरी’ नावाची एक प्रेमकहाणी लिहित होतो. मी साजिदला सांगितले की, आपण कैफ साहेबांकडून गाणी लिहून घेऊ. त्यानेही होकार दिला. त्यावेळी तिथेच असलेले लेखक फैज साहेब म्हणाले की, कैफ साहेब तर कमाल अमरोहींशिवाय कुणासाठीही गाणी लिहित नाहीत. मी म्हणालो की, मीसुद्धा भोपाळी आहे, त्यांना लिहिण्यासाठी राजी करेन. मी भोपाळला जाणारच आहे, त्यांचा होकार घेऊनच परत येईन.

मी भोपाळला पोहोचलो. एअरपोर्टवरून घरी पोहोचलो. समोर टेबलावर वृत्तपत्र ठेवले होते. त्याच्या पहिल्या पानावर कैफ भोपाली यांचा तत्कालीन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्यासोबतचा फोटो छापला होता. कैफ भोपालींची तब्येत अत्यंत गंभीर असल्याची बातमी होती. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री गेले होते. तो फोटो पाहिल्यावर मला खूप दु:ख झाले. त्यांची प्रकृती सुधारावी, म्हणून मी प्रार्थना केली. सायंकाळी रेडिओ स्टेशनवर ऑल इंडिया मुशायरा होता.

मी तिथे पोहोचलो. त्या ठिकाणी मोठमोठे शायर आले होते. शेरी भोपाली मुशायऱ्याचे संचालन करत होते. अचानक काही हालचाल सुरू झाली. पाहिले तर कैफ साहेबांना तिथे आणण्यात आले होते. मी थक्क झालो. त्यांना तीन-चार तक्क्यांचा आधार देऊन बसवण्यात आले. त्यांचे वजन खूपच कमी झालेले होते. शेरी साहेब म्हणाले, ‘हा कैफ वयाने माझ्यापेक्षा खूप लहान आहे. आपण सगळे त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करु. मी खूप जगलोय, आता याला जगायचंय आणि खूप उत्तमोत्तम शेर ऐकवायचेत..’

तिथे असलेल्या सर्वांना वाटत होते की, कैफ साहेब या अशा आजारी अवस्थेत कसे काय शेर सादर करणार? पण, कैफ साहेबांच्या समोर माइक ठेवण्यात आला आणि त्यांनी शायरी एेकवत अशी मैफिल रंगवली की ते आजारी आहेत हेही लोक विसरुन गेले. लोक फर्माइशवर फर्माईश करत होते आणि कैफ साहेब गझला, शेर ऐकवतच होते. मला वाटते तो कैफ साहेबांचा अखेरचा मुशायरा होता. ते या जगातून निघून गेले, पण त्यांचे शब्द चिरंतन आहेत. त्यांची कन्या परवीन कैफ ही खूप उत्तम शायरा आहे. ती कैफ साहेबांचे नाव आणि काम पुढे नेत आहे. कैफ भोपालींच्या आठवणीत ‘शंकर हुसैन’ सिनेमातील हे गाणे ऐका…

अपने आप रातों में

चिलमनें सरकती हैं

चौंकते हैं दरवाजें

सीढ़ियां धड़कती हैं…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link

Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी ऑनलाइन तिकीट कसं बुक करावं? वाचा

0
Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी ऑनलाइन तिकीट कसं बुक करावं? वाचा


Republic Day 2025 Parade Online Ticket: भारतात दरवर्षी २६ जानेवारी रोजी आपला प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे.  या दिवशी दिल्लीत परेड आणि बीटिंग रिट्रीटच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.  हे कार्यक्रम पाहण्यासाठी भारतीयांची मोठी गर्दी असते. या कार्यक्रमाच्या तिकिटांची सरकारी पोर्टलच्या माध्यमातून २ जानेवारी २०२५ पासून विक्री केली जात आहे. याशिवाय, या कार्यक्रमांचा अनेक चॅनेलवर लाईव्ह टेलिकास्ट सुरु असतो, जेणेकरून प्रत्येक भारतीयाला या कार्यक्रमांचा आनंद घेता येईल.



Source link

Law of India : एफआयआर शिवाय एखाद्या व्यक्तीला अटक करता येते का? महिलांसाठी नियम काय? जाणून घ्या

0
Law of India : एफआयआर शिवाय एखाद्या व्यक्तीला अटक करता येते का? महिलांसाठी नियम काय? जाणून घ्या


General Knowledge: देशात प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगळा कायदा आणि त्यासाठी शिक्षेची भारतीय संविधानात तरतूद आहे. परंतु, तु्म्हाला माहिती आहे का, कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्याआधी एफआयआर का नोंदवला जातो? एफआयआरशिवाय एखाद्या व्यक्तीला अटक करता येत नाही का? महिलांसाठी काय नियम आहेत? आज आपण त्यामागचे उत्तर जाणून घेऊयात.



Source link

Nashik: नाशिक जिल्हा रुग्णालयातून ५ दिवसांचे बाळ चोरीला, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद!

0
Nashik: नाशिक जिल्हा रुग्णालयातून ५ दिवसांचे बाळ चोरीला, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद!


Nashik News: नाशिक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातून पाच दिवसांचे बाळ चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ माजली. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली. तपासात एक अज्ञात महिला रुग्णालयाबाहेरून बाळाला घेऊन जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.



Source link

Mumbai Fire: मुंबईतील वांद्रे परिसरात भीषण आग, २० ते २५ झोपड्या जळून खाक, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

0
Mumbai Fire: मुंबईतील वांद्रे परिसरात भीषण आग, २० ते २५ झोपड्या जळून खाक, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर


Mumbai Fire News: मुंबईतील वांद्रे भागात शनिवारी (०४ जानेवारी २०२४) दुपारी भीषण आग लागली. या आगीत २० ते २५ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.



Source link

सोशल मीडिया वापरासाठी मुलांना लागणार पालकांची परवानगी, जाणून घ्या नियम!

0
सोशल मीडिया वापरासाठी मुलांना लागणार पालकांची परवानगी, जाणून घ्या नियम!



Social media Rules For Childrens: केंद्र सरकार आता लवकरच लहान मुलांच्या सोशियल मीडिया वापर वर कायदा आणणार आहे.



Source link

मुंड्या-फिंड्याचं नावही घेत नाही, पण देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर…; मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडेंना थेट इशारा

0
मुंड्या-फिंड्याचं नावही घेत नाही, पण देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर…; मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडेंना थेट इशारा


Manoj Jarange Patil News: बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी शनिवारी परभणी शहरात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नूतन महाविद्यालयाच्या मैदानापासून सुरू झालेल्या या मोर्चाचा समारोप शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झाला. या मोर्चात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. मी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचे नाव घेतले नाही. पण देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर, धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, असाही त्यांनी इशारा दिला. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मागतोय तर, आम्ही जातीयवादी कसे? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.



Source link

बारामती-फलटण एसटी बसला आग, प्रवासी सुखरूप; जिवीत हानी टळली

0
बारामती-फलटण एसटी बसला आग, प्रवासी सुखरूप; जिवीत हानी टळली

फलटण  :- महादेवनगर, फलटणजवळ बारामतीवरून फलटणला येणाऱ्या एसटी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये संपूर्ण एसटी बस जळून खाक झाली आहे. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही.

आगीची घटना घडल्यावर चालक व वाहक यांनी प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून तपास सुरू आहे.

ही घटना फलटणपासून जवळ असलेल्या महादेवनगर येथे घडली. एसटी महामंडळाने या घटनेची दखल घेतली असून बसच्या तांत्रिक दोषांबाबत चौकशी सुरू आहे.