Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 290

मद्यपानासाठी दिघीत व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

0
मद्यपानासाठी दिघीत व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी



पिंपरी : मद्यपानासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी चाकूचा धाक दाखवून भंगार व्यावसायिकाला धमकी दिल्याचा प्रकार दिघीत घडला. याप्रकरणी व्यावसायिकाने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संग्रामसिंग गजलसिंग भादा (रा. दिघी) याला अटक केली असून, त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे भंगार मालाचे दुकान आहे. आरोपींनी मद्यपानासाठी ५०० रुपये मागितले. त्यांनी नकार दिल्याने त्यांना धमकी देण्यात आली.

लूटमार प्रकरणी तिघांना अटक

ताथवडे परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका ट्रकचालकास मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.शैलेश विकास सरोदे (वय २०, बोपोडी), आशिष संतोष सोजवळ ( वय २६, बोपोडी), साहील सलीम शेख (रा. खडकी बाजार) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बंडू मुकिंदा शेळके ( वय ४३, रा. हिंगणा, नागपूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा मे रोजी पहाटे तीनच्या सुमारास शेळके हे त्यांच्या ट्रकमध्ये ताथवडे येथे झोपले होते. त्यावेळी दोन दुचाकीवरून चार आरोपी आले. त्यांनी ट्रकमध्ये झोपलेल्या शेळके यांना जबरदस्तीने खाली उतरवले. दमदाटी, शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच कोयत्याचा धाक दाखवून खिशातून दोन हजार शंभर रुपये जबरदस्तीने काढून घेतले.



Source link

india attacked nine terror camps in Pakistan real strength yet to show said minister yogesh Kadam

0
india attacked nine terror camps in Pakistan real strength yet to show said minister yogesh Kadam



india attacked nine terror camps in Pakistan real strength yet to show said minister yogesh Kadam | वाघाने फक्त पंजा दाखवला;अजून जबडा काढला नाही, योगेश कदम यांची प्रतिक्रिया



Source link

security guards involved in pipe theft worth over Rs 33 lakh of Water purification plant near Ambernath zws 70

0
security guards involved in pipe theft worth over Rs 33 lakh of Water purification plant near Ambernath zws 70



security guards involved in pipe theft worth over Rs 33 lakh of Water purification plant near Ambernath zws 70 | लाखोंच्या वाहिनी चोरीत सुरक्षा रक्षकांचाच हात; शेजारचा भंगारवाला निघाला सुत्रधार, ६ जणांना अटक



Source link

Operation Sindoor special military operation against terrorist Reaction of Lele family in Dombivli zws 70

0
Operation Sindoor special military operation against terrorist Reaction of Lele family in Dombivli zws 70



Operation Sindoor special military operation against terrorist Reaction of Lele family in Dombivli zws 70 | दहशतवाद्यांवरील हल्ले सुरूच ठेवा; डोंबिवलीतील लेले कुटुंबीयांची प्रतिक्रिया



Source link

after operation sindoor jubilant celebrations in sangli and miraj included distributing sweet

0
after operation sindoor jubilant celebrations in sangli and miraj included distributing sweet



after operation sindoor jubilant celebrations in sangli and miraj included distributing sweet | पाकिस्तानातील अतिरेकी तळ उद्ध्वस्त केल्याबद्दल सांगलीत साखरपेढे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला.



Source link

पाकिस्तानला चीनची साथ नाहीच, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर चीनची भूमिका काय?

0
पाकिस्तानला चीनची साथ नाहीच, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर चीनची भूमिका काय?


Operation Sindoor:  पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मध्यरात्री भारतानं दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जगातील अनेक मोठ्या महाशक्ती भारताच्या पाठिशी असल्याचंच दिसत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अनेक वर्षांपासूनच आहे. तसंच हा संघर्ष लवकर संपले अशी आशा असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तर भारताच्या कारवाईनंतर पाकिस्ताननं कोणतीही कृती करण्याचा विचार करू नये, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांनी पाकिस्तानला बजावलं आहे.

अमेरिकेनं पाकला बजावलं

भारताच्या कारवाईविरोधात कोणतीही कृती करण्याचा पाकिस्ताननं विचार करू नये. दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचा भारताला अधिकार होता. त्यामुळे भारताला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननं कोणतीही योजना आखू नये. पाकिस्तानी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा करत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियोंनी फटकारलं. भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईनंतर भारताला जगभरातून समर्थन मिळत आहे. अमेरिकेनं पाकिस्तानला बजावल्यानंतर आता इस्त्रायलनं देखील भारताचं समर्थन केलं आहे.

इस्त्रायलकडून भारताचं समर्थन

भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे इस्रायल समर्थन करतो. निरपराध लोकांवर केलेल्या भयंकर हल्ल्यानंतर लपण्यासाठी कुठेही स्थान मिळणार नाही, याचा धडा दहशतवाद्यांना मिळालाच पाहिजे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर चीन पाकिस्तानची साथ देईल अशी शक्यता होती. मात्र, भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर चीननं आपली भूमिका बदलल्याचं दिसत आहे.

चीनची भूमिका काय?

आम्हाला सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता आहे. भारत आणि पाकिस्तान हे चीनच्या शेजारी आहे. दहशतवाद जगासाठी धोकादायक आहे. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

पाकिस्तानमधील सर्वसामान्य जनतेवर भारतानं एअर स्ट्राईक केल्याचा कांगावा पाकिस्ताननं केला आहे. भारतानं केलेला हल्ला दहशतवाद्यांवर नसून तो सर्वासामान्य जनतेवर केल्याचं पाकिस्तानला जगाला दाखवायचं होतं. मात्र, भारतानं दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना अचूक टार्गेट करत त्यांचा खात्मा केला. याचं ब्रिफिंग देखील भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी केलं आहे. त्यामुळेच भारताला जगातील शक्तिशाली देशांनी समर्थन देत पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे.





Source link

Many departments skipped the review meeting for the full-dress rehearsal – the District Collector took serious note of it nashik | रंगीत तालीम आढावा बैठकीकडे अनेक विभागांची पाठ

0
Many departments skipped the review meeting for the full-dress rehearsal – the District Collector took serious note of it nashik | रंगीत तालीम आढावा बैठकीकडे अनेक विभागांची पाठ



Many departments skipped the review meeting for the full-dress rehearsal – the District Collector took serious note of it nashik | रंगीत तालीम आढावा बैठकीकडे अनेक विभागांची पाठ – जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल



Source link

स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुप्रीम कोर्टाची गती: 4 महिन्यांत निवडणुका, ओबीसी आरक्षण 2022 पूर्वीचेच लागू

0
स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुप्रीम कोर्टाची गती: 4 महिन्यांत निवडणुका, ओबीसी आरक्षण 2022 पूर्वीचेच लागू


फलटण — गेल्या चार-पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर सुप्रीम कोर्टाने गती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की 2022 पूर्वीचे ओबीसी आरक्षण कायम ठेवून येत्या चार महिन्यांत निवडणुका घ्याव्यात. या आदेशानंतर राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला निवडणुकांसाठी जोरात तयारी करावी लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने 73 व 74 व्या घटना दुरुस्तीनुसार निवडणुका लांबणीवर टाकणे म्हणजे संविधानाच्या मूळ हेतूला हरताळ फासणे असल्याचे मत व्यक्त केले. राज्य सरकारला निवडणुका घेण्यात कोणतीही अडचण नसल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. मात्र, राज्य सरकारच्या याचिकेमधील काही मुद्दे — जसे की पूर्वीची प्रभाग रचना ठेवायची की नव्याने करायची, तसेच ओबीसी आरक्षणाचा अंतिम निर्णय — अद्याप प्रलंबित आहेत. निवडणूक आयोगाने पुढील चार आठवड्यांत नोटिफिकेशन काढून तयारीला सुरुवात करावी, असेही कोर्टाने स्पष्ट केले. ज्या ठिकाणी निवडणुका घेणे शक्य नाही, तेथे आयोगाने न्यायालयाकडून मुदतवाढ घेणे बंधनकारक असेल.

भारताचा पाकिस्तानवर निर्णायक हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’ला शरद पवारांचा बिनशर्त पाठिंबा; मात्र चीनच्या भूमिकेबाबत चिंता

0
भारताचा पाकिस्तानवर निर्णायक हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’ला शरद पवारांचा बिनशर्त पाठिंबा; मात्र चीनच्या भूमिकेबाबत चिंता

साहस टाईम्स :- काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 ठिकाणी जोरदार हवाई कारवाई केली. या कारवाईत 90 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

भारतीय हवाई दलाची सीमा न ओलांडण्याची खबरदारी

पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, “गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये जे काही घडलं त्यामुळे देशभर अस्वस्थता निर्माण झाली होती. निष्पाप नागरिकांचा बळी गेला. भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कॅम्पवर हल्ला करून योग्य कृती केली. मात्र या कारवाईत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली नाही, ही बाब उल्लेखनीय आहे.”

स्थानिक काश्मिरी जनतेचा दहशतवादाविरोधात उभा राहणे महत्त्वाचे

पवार म्हणाले की, “काश्मीरमधील हल्ल्यानंतर स्थानिक जनतेने आणि नेत्यांनी दहशतवादाचा निषेध केला. विधानसभा ठराव, ओमर अब्दुल्लांची भूमिका यामुळे काश्मीरमधील बदललेली मानसिकता दिसून आली आहे. पाकिस्तानच्या आर्थिक नाकेबंदीचं धोरण हे योग्य दिशेने आहे.”

‘ऑपरेशन सिंदूर’ला सर्वपक्षीय पाठिंबा

शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं की, “सुप्रिया सुळे यांनी सर्वपक्षीय बैठकीत सहभाग घेतला होता. अशा वेळी राजकारण न करता आम्ही सरकारसोबत आहोत. काल रात्री जी कारवाई झाली, तिच्या पाठी आमचा पाठिंबा आहे.”

चीनच्या भूमिकेबाबत शंका आणि इशारा

मात्र या सर्व सकारात्मक भूमिका घेत असताना, पवारांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “अमेरिका, जपान आणि इतर देशांनी भारताच्या या कारवाईला पाठिंबा दिला. पण चीनने मात्र अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. हे चिंतेचं कारण आहे. पाकिस्तानची क्षमता वेगळी आणि भारताची वेगळी आहे, पण चीनचा पवित्रा पाहता आपण सावध राहण्याची गरज आहे.”

पत्राचाळीतील २३४३ घरांच्या प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन

0
पत्राचाळीतील २३४३ घरांच्या प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन


मुंबई: गोरेगाव, पश्चिम येथील सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला उपलब्ध झालेल्या भूखंडापैकी चार भूखंडांवर मंडळाकडून २३४३ घरे बांधण्यात येणार आहेत. या घरांच्या बांधकामाचे कार्योदेशही कंपन्यांना देण्यात आले आहेत. आता या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे. त्यानुसार लवकरच या प्रकल्पाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे.

रखडलेला पत्राचाळ पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून पूर्ण करण्यात येत आहे. त्यानुसार पुनर्वसित आणि सोडतीतील घरांच्या इमारतींचे काम पूर्ण केल्यानंतर मंडळाने गृहनिर्मितीसाठी काही भूखंड उपलब्ध झाले असून त्यापैकी चार भूखंडांवर घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आर-१, आर-७, आर-४ आणि आर-१३ या भूखंडांवर मिळून एकूण २३४३ घरे बांधली जाणार आहेत. या घरांच्या बांधकामासाठी २०२४ मध्ये मंडळाने निविदा प्रक्रिया राबवली. निविदा अंतिम करून चार कंत्राटदारांना कार्यादेशही देण्यात आले. या गृहप्रकल्पात मध्यम गटासाठी सर्वाधिक १२४२ घरे बांधली जाणार आहेत. अल्प गटासाठी १०२३ आणि उच्च गटासाठी १३३ घरांची निर्मिती केली जाणार आहे. या घरांचे काम २०२८-२९ मध्ये पूर्ण करण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आहे.

कार्योदेश जारी झाल्यानंतर भूखंड साफसफाईसह अन्य प्राथमिक कामे कंत्राटदारांकडून सुरु आहेत. मात्र अद्याप प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली नसून थाटामाटात भूमिपूजन करून बांधकामास सुरुवात करण्याचा घाट म्हाडा प्राधिकरणाने घातला आहे. आपल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यातही त्याचा समावेश केला आहे. मात्र अद्याप भुमिपूजन झालेले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने भुमिपूजन रखडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र लवकरात लवकर भुमिपूजन करत बांधकामास सुरुवात करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. त्यानुसार भुमिपूजनासाठी वेळ घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

कुठे किती घरे

आर १ भूखंड

● बांधकाम क्षेत्रफळ- ४८३८.१७ चौरस मीटर

● मध्यम गटासाठी ५०४ घरे (७६९ चौरस फूट)

● उच्च गटासाठी ६८ घरे (१०१७ चौरस फूट)

● एकूण ५७२ घरे

आर ७ भूखंड

● बांधकाम क्षेत्रफळ – ३१२७.७३ चौरस मीटर

● अल्प गटासाठी ३१६ घरे (४७९ चौरस फूट)

● मध्यम गटासाठी २६२ (८२८ चौरस फूट)

● एकूण – ५७८ घरेआर ४ भूखंड

● बांधकाम क्षेत्रफळ – ६०१९.५६ चौरस मीटर

● अल्प गटासाठी ७०७ घरे (४७३ चौरस फूट

)● मध्यम गटासाठी ३१८ घरे (७३१ चौरस फूट)

● एकूण १०२५ घरे

आर १३

● बांधकाम क्षेत्रफळ – २७६९.७८ चौरस मीटर

● मध्यम गटासाठी १५८ घरे (७४१ चौरस फूट)

● उच्च गटासाठी ६५ घरे (९९३ चौरस फूट)



Source link