Sunday, July 12, 2026
Home Blog Page 2896

सातारा : कासकडे घाटाईदेवी मार्गे जाणाऱ्या रस्‍त्‍याला भेग; २ एसटी बस अडकल्‍या | पुढारी

0


सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा कासकडे घाटाईदेवी मार्गे जाणाऱ्या रस्त्याला मधोमध भेग पडली आहे. त्‍यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या दोन एसटी अडकल्या आहेत. रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याचे सकाळी निदर्शनास आले. कास बामणोलीकडे जाणारी एसटी चिखलात अडकली आहे. कासकडे जाणारा हा घाटाई रोड वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जातो. कारण कास धरण भरल्यामुळे रस्त्यावर पाणी आहे. त्यामुळे हा रस्ता बंद करून घाटई मार्गे वाहतूक वळवण्यात आलेली आहे.

हेही वाचा :  

The post सातारा : कासकडे घाटाईदेवी मार्गे जाणाऱ्या रस्‍त्‍याला भेग; २ एसटी बस अडकल्‍या appeared first on पुढारी.



Source link

Sandip Deshpande on Thackeray : जे भाषणात, तेच विधानसभेत, आणि तेच मुलाखतीत,पॉडकास्ट मुलाखतीवर टीका

0
Sandip Deshpande on Thackeray : जे भाषणात, तेच विधानसभेत, आणि तेच मुलाखतीत,पॉडकास्ट मुलाखतीवर टीका



<p>उद्धव ठाकरे यांच्या पॉडकास्ट मुलाखतीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांची टिका. जे भाषणात, तेच विधानसभेत, आणि तेच मुलाखतीत. नवीन काहीच नाही. आज बाळासाहेब असते तर दोघांनाही शंभर उठाबशा काढायला लावल्या असत्या. संदीप देशपांडेंचं ट्विट.</p>



Source link

Jaya Bachchan: ‘मी बहिरी नाही, ओरडू नका…’; जया बच्चन पुन्हा मीडियावर वैतागल्या! Video Viral

0
Jaya Bachchan: ‘मी बहिरी नाही, ओरडू नका…’; जया बच्चन पुन्हा मीडियावर वैतागल्या! Video Viral


ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. या ठिकाणी मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता नंदा यांची वाट पाहत त्या थांबल्या होत्या. त्याच वेळी पापाराझींनी मोठ्याने त्यांचे नाव घेण्यास सुरुवात केली. पापाराझी त्यांना कॅमेऱ्यात पाहण्यास सांगत होते. मात्र, त्यावेळी जया बच्चन पुन्हा एकदा मीडियावर वैतागल्या. जया बच्चन पापाराझींना असं काही बोलल्या की, त्यांचा हा व्हिडीओ चर्चेत आला. त्या पापाराझींना ओरडून म्हणाल्या की, ‘मी बहिरी नाही. ओरडू नका आरामात बोला.’



Source link

नागठाणेच्या शिकलगार टोळीतील चौघांना ‘मोक्का’ | पुढारी

0









सातारा /नागठाणे, पुढारी वृत्तसेवा : बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या साहिल शिकलगार या टोळीवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. टोळीमध्ये एकूण चौघांचा समावेश असून, पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या कारवाईने गुन्हेगारीवर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे.

साहिल रुस्तुम शिकलगार, भरत संजय मोहिते, अमित ऊर्फ कन्हैया सुनील साळुंखे, आशिष बन्सीराम साळुंखे (सर्व रा. नागठाणे, ता. जि. सातारा) अशी टोळीतील संशयितांची नावे आहेत.

संशयित टोळीवर बोरगाव पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल आहे. त्यांनी एकाला कोयत्याने, पट्ट्याने, हाताने व लाथाबुक्याने तोंडावर, पाठीवर व अंगावर गंभीर मारहाण करून तक्रारदार यांच्याकडील 25 हजार रुपयांची रक्कम चोरली होती. बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या तपासामध्ये संशयितांनी टोळीची दहशत निर्माण करून आर्थिक व इतर फायद्याकरिता संघटितपणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने सपोनि रवींद्र तेलतुंबडे यांनी टोळी विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती संकलित केली.

यामध्ये जुलुम, जबरदस्ती करून हिंसाचाराची धमकी देत तसेच अन्य अवैध मार्गाने दहशतीच्या बळाचा वापर करून गंभीर स्वरुपाचे कृत्ये केली असल्याने संशयितांविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोक्का) कारवाईसाठी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. सातार्‍यातून कोल्हापूर परिक्षेत्र कार्यालयात पाठवला असता मोक्काच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास सातारचे डीवायएसपी किरणकुमार सुर्यवंशी करत आहेत.

दरम्यान, नोव्हेंबर 2022 पासून आतापर्यंत 7 मोक्का प्रस्तावामध्ये 105 जणांविरुध्द मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. तसेच 19 जणांना हद्दपार व एकावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले आहे. भविष्यातही अशाच प्रकारे गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.











Source link

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणे निम्म्यावर | पुढारी

0









सातारा, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, पावसाचा जोर आणखी वाढला आहे. कोयना धरणात 54 टीएमसी पाणीसाठा झाला असून, जिल्ह्यातील प्रमुख धरणांनी पन्नाशी पार केली आहे. 11 मोठ्या व मध्यम पाणी प्रकल्पांमध्ये सुमारे 94 हजार क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे. मोठ्या व मध्यम प्रकल्पांत 157.48 टीएमसी पैकी 81.64 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून, धरणे भरण्यासाठी अजून पावसाची आवश्यकता आहे.

जिल्ह्याला प्रतीक्षा लागून राहिलेल्या पावसाने पश्चिम भागात दमदार हजेरी लावली. त्यामुळे कास धरण, वेण्णा लेक हे पिण्याच्या पाण्यासाठी वापरात असलेले प्रकल्प लवकर ओव्हरफ्लो झाले. मात्र, जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांसाठी जादा पावसाची आवश्यकता होती. गेल्या दोन-चार दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. भारतीय हवामान खात्याने बुधवारसाठी रेड अलर्ट जारी केल्याने जोरदार पावसाची शक्यता आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्यामुळे पाणी प्रकल्पांमध्ये पाण्याची मोठी आवक सुरू आहे.

कोयना धरणात 60 हजार 396 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू असून 58.81 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धोम धरणात 8 हजार 538 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू असून 6.48 टीएमसी पाणीसाठा आहे. धोम बलकवडी धरणात 1 हजार 699 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक व 3.36 टीएमसी पाणीसाठा आहे. कण्हेर 8 हजार 53 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू असून 4.70 टीएमसी पाणीसाठा आहे. उरमोडी धरणात 4 हजार 50 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू असून 4.73 टीएमसी पाणीसाठा आहे. तारळी धरणात 4 हजार 928 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू असून 5.03 टीएमसी पाणीसाठा आहे. या मोठ्या प्रकल्पांत सर्व मिळून 140.86 पैकी 78 टीएमसी पाणीसाठा झाला असून त्याची टक्केवारी 55.38 इतकी आहे.

मध्यम प्रकल्पांत अपवाद वगळता पाणीपातळी अतिशय खालावली आहे. 10 पैकी 5 धरणांमध्येच पाण्याची आवक सुरू आहे. त्यामध्ये वांग-मराठवाडी धरणाची 2.73 टीएमसी क्षमता असून 1.90 टीएमसी पाणीसाठा आहे. हागेघर धरणाची 0.26 टीएमसी क्षमता असून 0.088 टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे. महू धरणाची 1.10 टीएमसी क्षमता असून 0.871 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. उत्तरमांड धरणाची 0.88 टीएमसी क्षमता असून 0.385 इतकाच पाणीसाठा आहे. मोरणा-गुरेघर धरणाची 1.39 टीएमसी क्षमता असून 0.906 टीएमसी पाणी आहे. नागेवाडी धरणाची 0.23 टीएमसी क्षमता असून त्यामध्ये 0.064 टीएमसी क्षमता आहे. सातारा, जावली आणि पाटण तालुक्यात पावसाचा जोर असल्यामुळे या मध्यम प्रकल्पांमध्ये 6 हजार 142 क्युसेक्स प्रतिसेकंद इतकी पाण्याची आवक सुरू आहे. मोठ्या व मध्यम प्रकल्पांत 157.48 पैकी एकूण 81.64 टीएमसी पाणीसाठा आहे.











Source link

कासकडे घाटाईदेवी मार्गे जाणाऱ्या रस्त्याला मधोमध भेग, दोन एसटी अडकल्या

0



Satara News: कासकडे घाटाईदेवी मार्गे जाणाऱ्या रस्त्याला मधोमध भेग, दोन एसटी अडकल्या



Source link

पोकलॅन ब्रेकर चोरीतील संशयित जेरबंद | पुढारी

0


दहिवडी, पुढारी वृत्तसेवा : दहिवडी येथील मुळीकवस्ती येथून जिहे कठापूरच्या पाणी पुरवठ्याचे काम करणार्‍या पोकलेन मशीनचा 13 लाख 33 हजार रुपये किंमतीचा ब्रेकर चोरीस गेल्याची तक्रार दहिवडी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. तक्रार दाखल होताच दहिवडी पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत सीसीटीव्ही फुटेज चेक करून चौघा संशयितांना जेरबंद केले. संशयितांकडून चोरीस गेलेल्या पोकलॅन ब्रेकरसह गुन्ह्यात वापरलेला जेसीबी, एक चार चाकी गाडी, ट्रॅक्टर ट्रॉली असा सुमारे 76 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रविराज जयप्रकाश गायकवाड (वय 25, रा. दहिवडी), अनिल देवराम राठोड (वय 30, रा. तुपेवाडी दहिवडी), सुजित दिलीप कांबळे (वय 27, रा. ढोकळवाडी पोस्ट विखळे ता. खटाव, हल्ली रा. तुपेवाडी दहिवडी) व अक्षय किसन जाधव (वय 26, रा. चव्हाण वस्ती वावरहिरे ता.माण) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत दहिवडी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, रविवार दि. 23 जुलै रोजी सायंकाळी 5 ते दि. 24 जुलै रोजीचे सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान दहिवडी येथील मुळीक वस्ती येथून पोकलेन ब्रेकर चोरी झाल्याची फिर्याद श्रीनिवासराव सूर्यनारायणा रावपल्ली (रा. हैद्राबाद तेलंगणा) यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात दिली होती.

याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या पथकाने घटनास्थळावरुन जाणार्‍या रोडला व इतर परीसरात असणारे सुमारे 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावरुन चोरट्यांची माहिती लक्षात आल्यावर चोरट्यांना त्यांनी ताब्यात घेवून विचारणा केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.

पोलिसांनी संशयितांकडून चोरीस गेलेला 13 लाख 33 हजारांचा पोकलेन ब्रेकर व संशयतांनी यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेला जेसीबी (क्र. एम एच 11डी.एच 1000), ट्रॉलीसह ट्रॅक्टर (क्र. के.ए 28 टी.ए 6205), चार चाकी (क्र. एमएच 12 क्यु.टी 3964) असा एकुण 76 लाख 33 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाईत सपोनि अक्षय सोनवणे, हवालदार बापू खांडेकर, धनंजय घाटगे, पोलिस नाईक स्वप्नील म्हामणे, पोलिस रामचंद्र गाढवे, अजिनाथ नरबट, सुहास गाडे, सागर लोखंडे, निलेश कुदळे यांच्या पथकाने केली.



Source link

Amjad Khan: ‘शोले’च्या ‘गब्बर’साठी अमजद खान नव्हते पहिली पसंती! मग कशी मिळाली भूमिका?

0
Amjad Khan: ‘शोले’च्या ‘गब्बर’साठी अमजद खान नव्हते पहिली पसंती! मग कशी मिळाली भूमिका?


बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र, संजीव कुमार, मेगास्टार अमिताभ बच्चन, सत्येन कप्पू, सचिन, असरानी, अमजद खान, अभिनेत्री जया बच्चन आणि हेमा मालिनी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी ‘शोले’ या मल्टीस्टारर चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या सर्वांच्या अप्रतिम अभिनयामुळे ‘शोले’ हा इंडस्ट्रीचा सदाबहार चित्रपट ठरू शकला आहे.



Source link

सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट; सतर्कतेचा इशारा | पुढारी

0


सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यात हवामान विभागाने दि. 28 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला होता. मात्र मंगळवारी पुन्हा दि. 26 जुलैपर्यंत रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागासह सर्वत्रच मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे नदी, ओढे नाल्यांना पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कृष्णा नदी काठावरील गावामधील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यासाठी हवामान विभागाने दि. 28 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला होता. मात्र मंगळवारी पुन्हा दि. 26 जुलैपर्यंत रेड अलर्ट दिला आहे. मंगळवारी सकाळपासूनच शहर परिसरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले असून अधूनमधून जोरदार वारे वहात होते. त्यामुळे हवेत गारठा निर्माण झाला होता. मुसळधार पावसामुळे पश्चिम भागातील नदी, नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे ओढे नाल्यांना पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. डोंगरदर्‍यामध्ये छोटे मोठे धबधबे प्रवाहीत झाले आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी पश्चिम भागात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पावसामुळे भात लागणीची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत. मुसळधार पावसाने पश्चिम भागातील घाट रस्ता व डोंगरदर्‍यामध्ये दरडी पडण्याचे प्रकार सुरु आहेत. प्रशासनामार्फत या दरडी त्वरित हटवण्यात येत आहेत.

धोम बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असून धरणामध्ये पाण्याची आवक 4 हजार 500 क्युसेक्स होत आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग दुपारी 3 वाजल्यापासून वाढवण्यात आला आहे. 3 हजार 500 क्युसेक्स पाणी धोम धरणामध्ये सोडण्यात येत आहे. बलकवडी धरणाखालील बलकवडी, परतवडी, कोंढवली, नांदवणे, वयगाव, दह्याट, बोरगाव या गावातील नागरिकांना नदीपात्रात न जाण्याच्या सूचना दिल्या असून धरण प्रशासनाने कृष्णा नदी काठावरील गावांमधील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

कुडाळी मध्यम प्रकल्प असलेल्या महू धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे महू धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू होवू शकतो. कुडाळी नदी काठावरील नागरिकांनी नदीपात्रामध्ये प्रवेश करु नये. तसेच पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये. सातारा तालुक्यातील ठोसेघर पासून 3 किलोमीटर असलेल्या मालोबा लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे.

महाबळेश्वरला 93.1 मि.मी. पाऊस

सातारा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा 24.9 मि. मी., जावली 37.7 मि. मी., पाटण 40.9 मि. मी., कराड 9.0 मि. मी., कोरेगाव 8.0 मि. मी., खटाव 5.6 मि. मी., माण 1.3 मि. मी., फलटण 0.5 मि. मी., खंडाळा 2.8 मि. मी., वाई 15.9 मि. मी., महाबळेश्वर 93.1 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.



Source link

Kargil Vijay Divas: ‘एलओसी कारगिल’ ते ‘लक्ष्य’; कारगिल युद्धावर आधारित बॉलिवूडचे ‘हे’ चित्रपट पाहिलेयत का?

0
Kargil Vijay Divas: ‘एलओसी कारगिल’ ते ‘लक्ष्य’; कारगिल युद्धावर आधारित बॉलिवूडचे ‘हे’ चित्रपट पाहिलेयत का?


एलओसी कारगिल : कारगिल युद्धाची कथा सांगणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘एलओसी कारगिल’ या चित्रपटाचा देखील समवेश आहे. हा चित्रपट २००३मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अजय देवगण, संजय दत्त, अभिषेक बच्चन, सैफ अली खान, सुनील शेट्टी यांसारखे मोठे बॉलिवूड कलाकार दिसले होते.



Source link