Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 162

समाजपरोपकारी कार्याचा गौरव करत सरन्यायाधीश भूषण गवई यांची समाधीस्थळाला भेट

0
समाजपरोपकारी कार्याचा गौरव करत सरन्यायाधीश भूषण गवई यांची समाधीस्थळाला भेट

कोल्हापूर : सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेचा दीपस्तंभ ठरलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अभिवादन केले. त्यांनी कोल्हापूर येथील शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन पुष्प अर्पण केले आणि त्यांच्या अद्वितीय योगदानाला नतमस्तक होत आदरांजली वाहिली.

यावेळी शाहू छत्रपती, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी नियुक्त न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता तसेच न्यायालयीन अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

शाहू महाराजांनी शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली करून सामाजिक प्रबोधन घडवले. त्यांच्या ‘समान न्याय’ या तत्त्वाने न्यायव्यवस्थेला समावेशक व मानवीय रूप दिले. हे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह अनेक समाजसुधारकांना प्रेरणादायी ठरले आहे.

दरम्यान, आज दि. १७ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वीय सहाय्यकांचे दोन ठिकाणी मतदान; कराडमध्ये भाजपकडून पुरावा देत आरोप

0


Satara News : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मतदार याद्यांमध्ये केलेल्या घोटाळ्याच्या आरोपांमुळे देशात मोठं वादळ निर्माण झालं आहे. राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर देशात ठिकठिकाणी मतदार यादींमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप आणि दावे केले जात आहे. अशातच कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वीय सहायक गजानन आवळकर आणि त्यांच्या परिवाराचे नाव मतदार यादीत दोन ठिकाणी असल्याचा आरोप भाजपचे (Satara News) आमदार अतुल भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यासाठी त्यांनी विधानसभेची यादी देखील पुरावा म्हणून दिली आहे.

2024च्या विधानसभा निवडणुकीत दोन ठिकाणी मतदान, गुन्हा दाखल करण्याची मागणी

दरम्यान, 2024च्या विधानसभा निवडणुकीत आवळकर कुटुंबीयांनी कराड शहर आणि वाठार येथे दोन ठिकाणी हे मतदान केल्याचा आरोप करत भाजप प्रवक्ते मोहन जाधव यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. एकीकडे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोगस मतदानाचा विषय लावून धरलेला असताना राज्यातील काँग्रेसचे बडे नेते असलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वीय सहाय्यकाकडून हा प्रकार घडल्याचे समोर आल्याने सगळ्यांचाच भुवया उंचावल्या आहेत. यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचा आवळकर यांना पाठिंबा असल्याचाही आरोप विरोधकांनी केला असून, विशेष म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या बोगस मतदान पडताळणी समितीचे अध्यक्ष आहेत.

आणखी वाचा 

आणखी वाचा



Source link

एन. रघुरामन यांचा कॉलम: नात्यांमध्ये पैसा सर्वात मोठा अडसर ठरू शकतो!

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  नात्यांमध्ये पैसा सर्वात मोठा अडसर ठरू शकतो!


14 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

हे एक परिपूर्ण जुळलेले लग्न होते. वर आणि वधू दोघांनाही यापेक्षा चांगला जोडीदार मिळू शकला नसता. वर आयआयटी पदवीधर होता आणि भारतातील एका बड्या बहुराष्ट्रीय कंपनीचा प्रमुख होता. वधू हार्वर्डमधून एमबीए होती आणि अमेरिकेत एका कंपनीत चांगल्या पदावर काम करत होती. नेहमीप्रमाणे बोलणी खूप चांगली झाली. दोघांनाही हुंडा किंवा पैसे नको होता. त्यांच्या संभाषणातून हे स्पष्ट झाले की दोन्ही कुटुंबे पैशाच्या बाबतीत पूर्णपणे पारदर्शक होती. त्यांनी लग्नाचा खर्चही समान वाटून घेण्याचा निर्णय घेतला.

लग्न जुळण्याच्या शेवटच्या टप्प्यावर वराच्या वडिलांनी त्याच्या मुलाला आणि होणाऱ्या सुनेला खासगीत बोलण्यास सांगितले. कारण मुलाला एका छोट्या गोष्टीची चिंता वाटत होती. त्याला भीती होती की त्याची भावी पत्नी त्याच्यापेक्षा जास्त कमावते, ज्यामुळे त्यांच्या नात्यात कटुता येऊ शकते. ते हॉटेलच्या लाउंजमध्ये बसून बोलू लागले. जेव्हा त्याला वधूचा पगार कळला तेव्हा तो म्हणाला, ‘व्वा, हा तर माझ्यापेक्षा ४०% जास्त आहे.’ ती हसली आणि म्हणाली, ‘माझ्यावर सहाअंकी विद्यार्थी कर्ज आहे (१० लाखांपेक्षा जास्त). लग्नानंतर मला ते माझ्या पगारातून फेडावे लागेल.’ हे ऐकून तो परेशान झाला.

दहा मिनिटांनंतर जेव्हा गोष्टी पुढे सरकल्या नाहीत तेव्हा ते त्यांच्या पालकांकडे परतले. त्यांनी एक विचित्र परिस्थित एकमेकांना ‘बाय’ म्हटले. यानंतर वधूला तिच्या कुटुंबाकडून काहीही कळले नाही. तिचे मेसेजही येणे बंद झाले. जेव्हा तिला कळले की मुलांना हुंडा नको आहे, पण त्यांना कर्जही नको आहे तेव्हा तिने २७ महिन्यांत तिचे संपूर्ण कर्ज फेडले अन् या वर्षी तिचे दुसऱ्याशी लग्न झाले. या एका घटनेने तिला शिकवले की नातेसंबंध केवळ प्रेमावर आधारित नसतात, तर प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेवरही अवलंबून असतात.

गेल्या दशकात गोष्टी खूप बदलल्या आहेत. अलीकडच्या एका सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की लग्नाच्या वयातील ७०% तरुण पैशांबद्दल बोलण्यावर विश्वास ठेवतात. त्यांचा असा विश्वास आहे की ही चर्चा ‘लग्नाच्या खूप आधी’ व्हायला हवी. आर्थिक तज्ज्ञ याच्याशी सहमत आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की पैशांतील पारदर्शकतेचा अभाव नेहमीच घटस्फोटाकडे नेतो. खरं तर पैशांशी निगडित चर्चाच नाते किती मजबूत बनू शकते हे ठरवते.

व्यवस्थापन टीप

नातेसंबंधात दोन गोष्टी सर्वात मोठा अडथळा बनू शकतात – पहिली म्हणजे पैसा आणि दुसरी म्हणजे मुले. तरुणांना सल्ला की, पहिल्या तारखेला काहीही लपवू नये. विशेषतः पैशाशी संबंधित बाबी. वधू आणि वर दोघांनाही कर्जमुक्त लग्न हवे असते, भलेही त्यांनी नंतर एकत्र मालमत्ता खरेदीसाठी कर्ज घेतले तरीही.



Source link

एमएमआरमध्ये दुबईपेक्षाही मोठे, सुंदर शहर वसवू – मुख्यमंत्री

0
एमएमआरमध्ये दुबईपेक्षाही मोठे, सुंदर शहर वसवू – मुख्यमंत्री


मुंबई : पालघरमध्ये वाढवण बंदरालगत चौथी मुंबई तर अटल सेतूच्या पायथ्याशी तिसरी मुंबई वसविण्यात येणार आहे. ही नवीन शहरे वसविण्यासाठी विकासकांनी राज्य सरकारला सहाकार्य करावे. त्यांना आवश्यक ती मदत सरकार करेल. दोघांच्या सहकार्याने एमएमआरमध्ये येत्या १० वर्षांत दुबईपेक्षाही सुंदर असे मोठे शहर वसवून दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. वांद्रे-कुर्ला संकुल येथील क्रेडाय-एमसीएचआय आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

देशातील पहिले सर्वात मोठे आणि जगातील पहिल्या १० क्रमांकात मोडणारे बंदर वाढवण येथे उभारले जाणार आहे. या बंदरामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. तर या बंदरामुळे विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे. या बंदराशी एमएमआरला जोडण्यासाठी उत्तन – विरार सागरी सेतूचा विस्तार विरार ते पालघर, वाढवण बंदर असा केला जाणार आहे. त्यामुळे वाढवण बंदरावर पोहचणे सोपे होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. या बंदरामुळे निर्माण होणाऱ्या संधी लक्षात घेता वाढवण बंदरालगत चौथी मुंबई वसविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून चौथी मुंबई वसवली जाणार आहे.

तर दुसरीकडे अटल सेतूमुळे मुंबईतून नवी मुंबईत, तसेच नवी मुंबई विमानतळावर अवघ्या काही मिनिटांत पोहचणे शक्य होऊ लागले आहे. त्यामुळे अटल सेतू प्रभावित क्षेत्रात निर्माण होणारी संधी लक्षात घेता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून तिसरी मुंबई वसविण्यात येत आहे. या चौथ्या आणि तिसऱ्या मुंबईच्या माध्यमातून एक चांगले शहर वसविण्यासाठी क्रेडाय-एमसीएचआयमधील विकासकांनी सरकारला सहकार्य करावे.

तिसऱ्या मुंबईसाठी तुम्ही पुढे आलात, तर एमएमआरडीए आणि विकासक यांच्या संयुक्त भागिदारीतून तिसरी मुंबई वसविणे सोपे होईल. विकासकाला २४ टक्के, तर एमएमआरडीएला ७६ टक्के हिस्सा देण्यात येईल. सरकार परवनाग्या, भूसंपादनासाठी आवश्यक मदत करेल. ही संधी आहे, तुम्ही पुढे या आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे अगदी दुबईपेक्षाही सुंदर आणि मोठे शहर वसवू, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

यामुळे चौथी आणि तिसरी मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र होणार आहे. त्याचबरोबर एमएमआरमध्ये सागरी मार्ग, सागरी सेतू, भुयारी मार्ग, मेट्रो अशा अनेक प्रकल्पांमुळेही एमएमआरमध्ये विकासाच्या संधी निर्माण होणार आहेत. जेव्हा भारताची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डाॅलर्स बनविण्याचा विषय येतो तेव्हा यात महाराष्ट्राचा हिस्सा १ लाख कोटी डाॅलर्स असेल असे म्हटले जाते. पण केवळ एमएमआरची क्षमता १.५ लाख कोटी डाॅलर्स अर्थव्यवस्थेची आहे, असा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. नव्या विचारांने, नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण हे करू शकतो, तसा संकल्प आपण आज करू या, असेही ते म्हणाले.



Source link

ट्रम्प टॅरिफटोल्याचा ताळेबंद – Marathi News | Global Trade Research Initiative Study India Loss After Trump Impose Tariffs Zws 70

0
ट्रम्प टॅरिफटोल्याचा ताळेबंद – Marathi News | Global Trade Research Initiative Study India Loss After Trump Impose Tariffs Zws 70


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘मित्रदेश’ भारतावर प्रथम २५ टक्के जाचक आणि नंतर वाढीव २५ टक्के जुलमी आयात शुल्क अर्थात टॅरिफ आकारणीची धमकी दिल्यामुळे भारताच्या राजकीय आणि उद्योगविश्वात खळबळ उडाली आहे. भारताचे नक्की किती नुकसान होईल, याविषयी ठोकताळे अजूनही बांधले जात आहेत. ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’ (जीटीआरआय) या दिल्लीस्थित अभ्यासगटाने याबाबत काही आकडेवारी जारी केली आहे. याशिवाय विश्लेषकांकडूनही यावर सातत्याने प्रकाश टाकला जात आहे.

घोषणा आणि संरचना : २ एप्रिल २०२५ रोजी ट्रम्प यांनी भारतीय वस्तुमालाच्या आयातीवर २५ टक्के जशास तसे शुल्क अर्थात रेसिप्रोकल टॅरिफ आकारण्याची घोषणा केली. १ ऑगस्ट २०२५ पासून हे शुल्क लागू झाले. पण या धक्क्यातून सावरण्याआधीच ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त शुल्क शिक्षा म्हणून लागू केले. रशियाकडून तेलखरेदी आणि शस्त्रसामग्री आयात थांबवण्याविषयी भारताने कोणतेही आश्वासन न दिल्यामुळे हे पाऊल उचलल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. २१ ऑगस्टपर्यंत यासंदर्भात काहीतरी निर्णय घ्यावा, अन्यथा २७ ऑगस्टपासून वाढीव आयात शुल्क लागू होईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे

आर्थिक परिणाम किती?

भारताच्या ४३४ अब्ज डॉलर निर्यातीपैकी ८७ अब्ज डॉलरची निर्यात गतवर्षी एकट्या अमेरिकेत झाली. नवीन टॅरिफ दर अमलात आले, तर यात ५.७६ अब्ज डॉलर किंवा ६.४१ टक्क्यांची घट संभवते. कारण भारतीय वस्तुमालावर आयात शुल्क वाढल्यामुळे या वस्तू अमेरिकी बाजारात महागतील. याचा फायदा चीन, मेक्सिको, कॅनडा यांना होऊ शकतो. याशिवाय व्हिएतनाम, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि बांगलादेश या देशांच्या वस्तुमालावरील आयात शुल्क भारतापेक्षा कमी राहील. त्यामुळे अमेरिकेतील आयातदार आणि ग्राहक या देशांना पसंती देऊ शकतात. चीनवर भविष्यात भारतापेक्षा अधिक टॅरिफ लागू झाले, तरच भारताला थोडीफार आशा आहे.

कोणत्या क्षेत्रांना किती टॅरिफ फटका?

क्षेत्र                                      टॅरिफ ७ ऑगस्ट            टॅरिफ २७ ऑगस्ट

कापड                                           २५                                   ५०

तयार कपड दागिने, खड                २५                                  ५०

चामड्याच्या  वस्तू                         २५                                   ५०

मासळी                                       ३३.२६                             ५८.२६

                                                                         (अतिरिक्त शुल्क)

रसायने                                        २५                                     ५०

वाहन                                          २५                                     ५०

सुटे भाग लोखंड अॅल्युमिनियम   २५                                      ५०

कृषी उत्पादने                             २५                                       ५०

दुग्ध उत्पादने                            ५६.४६                                  ८१.४६

                                                                           (अतिरिक्त शुल्क)

वाहन उद्योगासमोर आव्हान आणि संधी

अमेरिकेने अलीकडेच लादलेल्या नव्या आणि वाढीव आयात शुल्कामुळे वाहनांसाठी लागणाऱ्या सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या भारतीय कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. उच्च आयात शुल्कामुळे भारत अमेरिकेत करीत असलेल्या सुट्या भागांच्या निर्यातीतील सुमारे १५ ते २० टक्के वाटा लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

मे २०२५ पासून अमेरिकेने लागू केलेल्या २५ टक्के आयात शुल्काची अंमलबजावणी सुरू आहेच, त्यात २५ टक्के शुल्क मिळून ५० टक्के शुल्क येत्या २७ ऑगस्टपासून अमलात येईल.

हेही वाचा

वाहनांतील सुट्या भागांची अमेरिकेला होत असलेली ३० ते ४० टक्के भारतीय निर्यात या व्यवसायातील कार्यक्रमांतर्गत निश्चित वाटा असलेली आहे. म्हणजे, अनेक मंजूर पुरवठादारांपैकी भारत हा एक पुरवठादार आहे. अमेरिकेतील खरेदीदारांकडे अन्य देशांतील म्हणजेच चीन वा मेक्सिकोमधील उच्च दर्जाचे पुरवठादार उपलब्ध असतील. हे पुरवठादार वाहनांतील सुटे भाग हुबेहूब तयार करतात. म्हणजे अमेरिका वाढीव आयात कराचा दट्ट्या दाखवून भारताबाहेरील पुरवठादारांकडून सुटे भाग मागवू शकेल. यासाठी त्यांना दीर्घकाळ चालणारी मंजुरी प्रक्रियेचीही गरज भासणार नाही, असे व्हेक्टर कन्सल्टिंग समूहाचे व्यवस्थापकीय भागीदार रवींद्र पत्की यांनी एका इंग्रजी नियतकालिकाला सांगितले.

‘द ऑटोमोटिव्ह कॉम्पोनन्ट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने अमेरिकेने लादलेल्या आयात कराचे एका बाजूने स्वागतच केले आहे. नव्या व वाढीव आयात करामुळे वाहनउद्याोगातील भारतीय कंपन्यांसमोर काही खडतर आव्हाने उभी राहतील, हे खरे आहे. परंतु, त्यासह जागतिक स्तरावर नवे स्पर्धात्मक वातावरण तयार होईल, शिवाय त्यातून वैविध्यपूर्ण उत्पादनास नवी बाजारपेठ तयार होईल. लॅटिन अमेरिका, आशिया व आफ्रिकेतील नव्या बाजारपेठेतही भारतीय उत्पादनांना मोठी संधी आहे. एका अर्थाने अमेरिकेच्या धडकी भरवणाऱ्या आयात कराचे आव्हान हे खचून जाण्यासाठी नाहीतर नव्या ताकदीने उभे राहण्यासाठी असल्याचे एव्हीआय इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अमन नागर सांगतात.

मत्स्यव्यवसायाला त्सुनामीतही संधी

भारतीय मत्स्यनिर्यातीतील सर्वांत मोठा ग्राहक (तब्बल ५४ टक्के) आहे अमेरिका. तिच्या आयात शुल्काचा बोजा आता तब्बल ५८.२६ टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. याचा जबरदस्त तडाखा भारतीय मत्स्यव्यसाय क्षेत्राला बसेल.

भारतातून अमेरिकेत प्रामुख्याने कोळंबी वर्गातील माशांची निर्यात केली जाते. आयात शुल्कवाढीमुळे आंध्र प्रदेश, ओदिशा, केरळमधील मत्स्यव्यावसायिकांना फटका बसणार आहे. जेवढ्यास तेवढे आयात शुल्क (३३.२६ टक्के) लागू झाल्यापासून गेल्या पंधरवड्यातच मोठ्या कोळंबीचे दर १९ टक्क्यांनी घटले आहेत. या शुल्कवाढीचा लाभ अन्य देशांना होऊ शकतो. केवळ १० टक्के टॅरिफ आकारले असल्यामुळे इक्वेडोर अमेरिकेचा मत्स्यबाजार काबीज करू शकतो. व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया हे साधारण २० टक्के टॅरिफ आकारलेले देशही ही संधी साधू शकतात. थोडक्यात भारतीय मत्स्योत्पादन क्षेत्रापुढील आव्हान खडतर आहे हे निश्चित, मात्र त्यातून मार्ग काढताच येणार नाही, असेही नाही.

स्थानिक बाजारांत मागणी वाढेल अशा उपाययोजना करणे, चीनमधील वाढत्या मागणीत संधी शोधणे, ब्रिटनशी झालेल्या मुक्त व्यापार कराराच्या माध्यमातून तेथील बाजारपेठेत अधिकाधिक वाटा मिळविणे, मत्स्यप्रक्रिया आणि पॅकेजिंगचा दर्जा सुधारणे अशी पावले उचलावी लागतील. २०१७ ते २०२५ या कालावधीत भारताची चीनमधील मत्स्यनिर्यात सुमारे दहा पटींनी वाढली आहे. २०१८ साली एकूण निर्यातीत चीनमधील निर्यातीचे प्रमाण २.४ टक्के होते. ते गतवर्षी १७ टक्क्यांपर्यंत पोहोचले. यावरून तेथील संधींचा अंदाज येतो. शिवाय दक्षिण कोरियाचा मत्स्यबाजारही विस्तारत आहे.

मत्स्यखाद्या उत्पादकांनी खाद्याचे दर कमी करून बुडत्या नौकेला आधार देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. निर्यातदारांनीही या क्षेत्रातील नोकऱ्या टिकाव्यात म्हणून पावले उचलली आहेत. थोडक्यात मत्स्यव्यवसायाला आव्हानांच्या त्सुनामीचा तडाखा बसणार असला, तरी त्या लाटेवर स्वार होता आल्यास नवे किनारे गवसण्याची शक्यताही आहे.

चर्मोद्योगाची आर्थिक होरपळ

मोठ्या प्रमाणात निर्यातीवरच अवलंबून असलेल्या भारतीय चर्मोद्याोगाची ‘कातडी’ अमेरिकेने भारतीय वस्तूंवर मोठ्या प्रमाणात कर लादलेल्या करांमुळे सोलून निघणार आहे. आयात शुल्क वाढल्याने भारतीय वस्तूंची मागणी कमी होऊ शकते आणि हा व्यवसाय प्रतिस्पर्धी देशांकडे वळण्याची भीती या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करतात.

भारतीय बनावटीच्या चामड्याच्या वस्तूंना जगभरात मागणी आहे. या उद्याोगातील ८० टक्के व्यवसाय निर्यातीवरच अवलंबून असतो. भारतात चामड्याच्या उत्पादनांचा फक्त २० टक्के वापर होतो. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर एकूण कर ५० टक्क्यांपर्यत वाढवल्याने भारतीय चामड्याचे उत्पादक व निर्यातदार मोठ्या प्रमाणावर आार्थिक अडचणींना तोंड देत आहेत. बांगलादेश, पाकिस्तान आणि व्हिएतनाम या देशांमध्येही मोठ्या प्रमाणात चर्मोद्याोग आहे. अधिक आयात शुल्कामुळे भारतीय वस्तूंची मागणी कमी होऊन प्रतिस्पर्धी देशांमध्ये हा उद्याोग वाढीस लागण्याची भीती उद्याोजकांना वाटते.

भारताची जगभरातील चामड्याची निर्यात २०२०-२१ मध्ये ३,६८१ दशलक्ष डॉलर होती. २०२४-२५ मध्ये ती ४,८२८ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली. म्हणजे तीन वर्षांत त्यामध्ये ३१ टक्के वाढ झाली. याच कालावधीत अमेरिकेतील निर्यात ६४५ दशलक्ष डॉलरवरून १,०४५ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली. म्हणजेच त्यात तब्बल ६२ टक्के वाढ झाली. मात्र अमेरिकेने आयात शुल्क वाढवल्याने या उद्याोगाला उतरती कळा लागून अनेकांच्या रोजगारांवर गडांतर येऊ शकते.

कोलकाता, कानपूर, चेन्नई आणि आग्रा हे भारतातील सर्वात मोठ्या पादत्राणे उत्पादन केंद्रांपैकी एक आहेत. आग्रा शहरात चामडी पादत्राणे निर्मितीचे अनेक लहान-मोठे उद्याोग आहेत. गेल्या तिमाहीत आग्र्यातून ५९४ दशलक्ष डॉलर निर्यात अमेरिकेत झाली. वाढ इतकी तीव्र होती की अनेक उत्पादकांनी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मोठी गुंतवणूक केली. मात्र आयात शुल्क वाढीच्या निर्णयामुळे येथील चर्मोद्याोगाची आर्थिक होरपळ होणार आहे.

वस्त्रोद्योगाचे धागे विरण्याची चिन्हे

डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिलमध्ये पहिल्यांदा टॅरिफ बॉम्ब टाकला तेव्हा भारतीय वस्त्रोद्याोगासाठी ती विस्ताराची नामी संधी मानली जात होती. त्या वेळी बांगलादेश, व्हिएतनाम, चीन या प्रतिस्पर्ध्यांवर भारताच्या तुलनेत अधिक आयात शुल्क आकरण्यात आले होते. या संधीचा लाभ घेण्यासाठी अनेक निर्यातदारांनी नवी यंत्रे विकत घेतली, मात्र अवघ्या चार महिन्यांत चित्र पुरते पालटले. आज भारतावर ५० टक्के टॅरिफचे संकट कोसळले असताना व्हिएतनाम आणि बांगलादेशाला २० टक्के तर चीनला ३० टक्केच टॅरिफ आकारण्यात आले आहे, परिणामी भारतीय वस्त्रोद्याोगाच्या जरतारी वस्त्राचे धागे विरण्याची चिन्हे आहेत.

भारतासाठी अमेरिका हा अतिशय महत्त्वाचा वस्त्रग्राहक आहे. अॅपरल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलकडील नोंदीनुसार भारतातून निर्यात होणाऱ्या एकूण तयार कपड्यांपैकी तब्बल ३३ टक्के कपडे अमेरिकेत जातात. शिवाय चादर, बेडशीटसारखे घरगुती वापराचे कपडे (६० टक्के) आणि गालिच्यांचाही (५० टक्के) अमेरिका मुख्य ग्राहक आहे. मात्र राक्षसी आयात शुल्कामुळे भारताला आता हा व्यवसाय गमावावा लागणार आहे.

बहुतेक उत्पादकांकडे नोंदवण्यात आलेल्या मागण्या एकतर तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत किंवा रद्दच झाल्या आहेत. टॅरिफरेट्यात लाखो कामगारांना नोकरी गमवावी लागण्याची चिन्हे आहेत. गेल्या पंधरवड्याभरातच कारखान्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. या क्षेत्राला वाचवण्यासाठी सरकारने कर्जांची फेररचना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सोपा नाही. भारत आणि ब्रिटनमध्ये झालेला मुक्त व्यापार करार, हा एकमेव आशेचा किरण आहे. त्यातून ब्रिटनमधील वस्त्रनिर्यात येत्या दोन वर्षांत दुप्पट होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र मुळातच भारताची ब्रिटनमधील वस्त्रनिर्यात अत्यल्प आहे. अमेरिकेतील निर्यात ब्रिटनमधील निर्यातीच्या चौपट आहे. साहजिकच त्यातून फारसा लाभ होण्याची चिन्हे नाहीत. थोडक्यात वस्त्रोद्योगाला सावरण्याचे आव्हान खडतर असणार आहे.

हरपली हिरे उद्योगाची झळाळी

भारत हे जगातील सर्वात मोठा हिरे घासणी व पॉलिशिंग केंद्र आहे. पण ट्रम्प टॅरिफच्या परिणामी या उद्याोगाला अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या रोजगारसंकटाचा सामना करावा लागत आहे. एप्रिलमध्ये अमेरिकेने मूळ १० टक्क्यांच्या दराने शुल्क लावले, त्याचा सौराष्ट्रातील हिरे घासणी व पॉलिशिंग उद्याोगातील जवळपास एक लाख कामगारांच्या रोजगारावर परिणाम झाला. त्यानंतर २५ टक्के आयात शुल्क लावण्यात आले आणि आता ते ५० टक्क्यांवर जाणार आहे यावरून या संकटाची व्याप्ती लक्षात येते. सूरत हे भारताचे सर्वात मोठे हिरे केंद्र आहे. तिथे आठ लाखांहून अधिक कामगार कार्यरत आहेत. राजस्थानातील जयपूर रंगीबेरंगी रत्न व डायमंड स्टडेड ज्वेलरीसाठी जागतिक स्तरावर ओळखले जाते. २०२५ या आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत या राज्याने १७,६७५ कोटी रुपयांची रत्ने व दागिने निर्यात केली, त्यापैकी सुमारे ३,१५४ कोटींची निर्यात अमेरिकेत झाली होती.

अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये भारतातून सर्वाधिक हिरे निर्यात होते. एवढेच नाही तर जागतिक पातळीवर तयार होणारे जवळपास ९० टक्के हिरे भारतातून प्रक्रिया होऊन जातात. २०२४ – २०२५ या आर्थिक वर्षात भारताने अमेरिकेला १० अब्ज डॉलर्स किमतीचे रत्न व दागिने निर्यात केले, ज्यामध्ये कट-अॅण्ड-पॉलिश डायमंड व डायमंड स्टडेड ज्वेलरी यांचा प्रमुख वाटा होता. यावरून या उद्याोगाची व्याप्ती लक्षात येते. व्हिएतनाम आणि थायलंड येथे आयात शुल्क कमी असल्यामुळे हे उद्याोजक तिथे स्थलांतरित होण्याचा विचार करत आहेत, असे सांगितले जाते. निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या ऑर्डर्स थांबवण्यात आल्या असून, आता ते पर्यायी बाजारपेठा शोधत आहेत. मात्र त्या निकट भविष्यात इतक्या जलदगतीने सध्याचे नुकसान भरून काढू शकणार नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.





Source link

पाखरांचं प्रमेय – Marathi News | Stories Pigeon Hobby In Marathi Literature Controversy Over Kabutarkhanas Shutdown Pigeon Feeding Row Zws 70

0
पाखरांचं प्रमेय – Marathi News | Stories Pigeon Hobby In Marathi Literature Controversy Over Kabutarkhanas Shutdown Pigeon Feeding Row Zws 70


श्री. दा. पानवलकर
मराठी साहित्याच्या भूमीत कबुतर नादावर एकामागोमाग आलेल्या दोन कथा प्रचंड गाजल्या. त्यातली पहिली जीएंची ‘चंद्रावळ’ आणि दुसरी श्री. दा. पानवलकरांची ‘मोतीचूर’. पुढे अट्टल कबुतरप्रेमी पानवलकरांनी ८ मार्च १९६४ च्या ‘लोकसत्ता’मध्ये ‘गुटुर्रघुम्म’ या नावाने प्रसिद्ध केलेल्या शब्दश्रीमंत लेखाला प्रतिसाद म्हणून दुर्गा भागवतांनी या पाखरांवर संताप व्यक्त करणारे टिपण लिहिले. मुंबईत कबुतरखान्याचा प्रश्न सध्या उग्र झालाय. ते असावेत की नसावेत, बंद करण्यात आल्यानंतर कपोत संप्रदायाचे काय होईल, याची चर्चाही जोरकस केली जातेय. पण तिचा आरंभ साठच्या दशकापासून जराही बदलला कसा नाही, याचा दाखला दिग्गजांच्या या खगमंथनातून डोकावेल…

‘गुटुर्रघुम्म’ हा फिरकीवजा गिर्रेबाज शब्द म्हणजे वट्टात एक बोली. ही एकाच शब्दाची. मुंबैकरांना नित्य परिचयाची होऊन राहिलेली. या बोलीत लडिवाळपणाची लटक, गिर्रेबाज हरकती, मुरक्या दिसू-ऐकू येतात. यात मानेचा डौल तसा गळ्याचा फुगवा आहे. मुंबैत कुठंही जा. भारताच्या महाद्वारापासून तो तहत वांद्य्राच्या उघड्या बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत, तसेच त्या बाजूला मुलुंड-ठाण्यापर्यंत या बोलीचा कडकडाट सहज नजरेला येतो.

फोर्ट, गिरगाव, काळबादेवी, ठाकुरद्वार इथल्या कुठल्याही इमारतीच्या अगर वाड्या-चाळींतल्या वळचणीला ढुंकून पाहा, चौपाटीवरच्या कॉस्मॉपालिटन पुळणीवर चक्कर टाका किंवा राजभवनाच्या आडअंगाच्या कडेकपारीत जा, वा फॉकलंड, फोरास, ग्रँट वगैरे रोडांच्या अगर गोलपिठ्याच्या वळणावरच्या बोळकांडातल्या बेचक्यात जाऊन धुंडा. न डोकावतासुद्धा सहज नजर टाकली तरी ही बोली कानावर पडेल, लगटून गोल गोल भरीव घुमाराही ऐकू येईल. दुनिया गेली भाड में. ‘गुटुर्रघुम्म’.

या एका बोलीत अखिल जागतिक कपोत संप्रदायाचे गुंजनात्मक व्यामिश्र व्यवहार चाललेले आढळून येतात. यात त्यांचे वाद, विवाद, संवाद, परिसंवाद, साद, प्रतिसाद सतत चालू असतात. या बोलीच्या अर्थांची भावपूर्ण वलयं मोजावी तेवढी थोडी. राग, लोभ, समजावणी, गमजावणी, आळवणी, अनुनय, इशारे यांच्या नाना परी. अशा या अर्थ व आशयगर्भ मुलायम बोलीला स्वत:चा नाद नसेल असं कसं शक्य आहे? मात्र हा नाद आत्मगत असतो. यात म्हटला तर ख्याल आहे. पण त्याला बोल नाहीत.

सुरावळीत क्वचित पंचम, किंचित ऋषभ चमकतो, तर क्वचित गांधार आणि लवभर धैवतही चिकटलेला दिसतो. मधूनच सुईच्या अग्रावर राहील न राहील एवढा कणसर मध्यमही जमून गेलेला कानावर येऊन जातो. अशी ही ‘पंचकल्याण’मधली बंदिश माणसाला जाग आणते. लय लागली तर कुणीही अवाक् व्हावे असा त्यात दर्दही आढळाला येतो. अंगठ्यावर उडवलेल्या बंद्या रुपयाचा छन्कार (बुचडा छाप राणीचा), नर्तिकेच्या (खजुराहोछाप अप्सरेच्या) चंचल पायांतल्या चाळांचा छनन्कार किंवा एखाद्या अनामिक जाज्वल्य भगताचा दबलेला ओंकारसुद्धा त्यात झळकून गेलेला लक्षात येतो. केवळ अनाघातातून उमळलेला म्हणून विश्वात असूनही अविश्वसनीय असा हा लोलुप नाद. हे एवढं समग्र नादब्रह्मांड या एकशब्दी विलोल बोलीत सामावलेलं ऐकू-दिसू आल्यास कुणी तोंडात बोट घालायला नको. कारण ते आहेच तसं. म्हणून.

हेही वाचा

या बोलीची मोडच करावयाची तर ती नजाकतीनं करावयास हवी. तर जेव्हा एकुलता कुठं तरी बसून ‘गुटुर्र’ करतो तेव्हा ‘आता काय करणं इष्ट आहे?’ असा एकांतिक कर्तव्यपरायण विचार व्यक्त करीत आहे असं जाणावं आणि जेव्हा नरमादी एकत्र येऊन ही भाषा करतात तेव्हा दोघंही सुराला सूर लावून ‘आपल्याला फार काही करायला हवं अं! म्हणजे प्रेमापासून पिलांचं लालनपालन करण्यापर्यंत सगळं काही इत्थंभूत केलं पाहिजे’ असं चंचुपुटातल्या पुटात जपणुकीचं हितगूज केलेलं ऐकू येतं. यात वाच्यता वा बभ्रा, बोभाटा केलेला दिसून येत नाही. सर्व काही आपापल्यांत. समजा केवळ मादीनंच स्वत:भोवती पिंगा घालून गर्रकन् ‘गुटुर्र’ केलं तर, ‘… आता कुठं जाल? म्हणजे कुठंही उडत जाऊ नका.

इथल्याशिवाय कुठंही फडफडायचं नाही.’ अशी सवतीमत्सरात्मक होकाराची धर्मकर्मयुक्त सूचना व्यक्त केल्याचं आढळून येतं. एरवी पिसं तुटेपर्यंत भांडणं, झटेझपाटे, दमदाट्या करतानाही ही बोली सरसहा वापरली जाते. मुळात ही एकच शब्दांची बोली असल्यानं तिला अनेक सूचनात्मक कंगोरे लाभले आहेत. आवाजात चढउतार करून घुमाऱ्याची नेमकी फेकफिरकी साधली जाते. पिसं उभी राहतात. बऱ्याच वेळा स्वत:वर नितांत खूश असल्याची मौनगर्भ सूचनाही बीजरूपानं केली जाते.

अशा वेळी मूक अर्थांची अनेक वलयं एकाच वेळी उगम पावून पसरत असताना दिसतात. त्यांत असंख्य वलयांकित लालित्यं भरलेली असतात. या एकूण नादानुकूल गोलंकारी प्रकारालाच ‘पाखरूबोली’ असं संबोधलं जातं. यात ‘पाखरू’ हा शब्द पक्षिविशेष म्हणून कबुतर या अर्थी किंवा मानवविशेष म्हणून ‘अलबेली नार’ (संदर्भ तपासून) विशेषत्वानं वापरला जातो. कुणी मानो वा न मानो. अशा या ‘पाखरू’ शब्दाला वरील अर्थाने दुर्दैवानं विश्व, संस्कृती, शब्द वा अमर इत्यादी जडजंबाल कोशांनी अनुल्लेखानं ठार ‘मा निषाद’ केलंय.

मात्र काहीही कसंही असलं तरी पब्लिकला या कबुतर-जमातीचा तसा ताप नाही; आणि असलाच तर तो पाहणाऱ्याच्या दृष्टीत वा कानांत. तुम्ही त्यांच्याकडे पाहू नका. काहीही बिघडणार नाही. तुमचं आणि त्यांचंही. मात्र नीट बघत आणि ऐकत राहाल तर तुमचंच रक्त फुका तापेल. दाब वाढल्याचीही भावना होण्याचा संभव आहे. त्यातून एखाद्यानं ताप करून घ्यायचाच असं ठरवलं तरीही हरकत नाही. सगळा खुल्लंखुल्ला मामला.

खुद्द भारताच्या त्या महाद्वारावर हमेशा उदंड पाखरं घुमताना दिसतील. एकोणीसशे चौदा सालापासून द्वाराच्या चिरेबंदी नक्षीदार वळचणीत ‘गुटुर्र घुम्म… टक टक टक गुटुर्र…’ करून कबुतर-घराण्याच्या कैक पिढ्यांनी आपापले संसार थाटले. कुरुंदाचे कमानदार बुलंद पत्थर शिटशिटून चुनेरी केले. पण त्या महाद्वारानं कुणाचाही राग धरला नाही. मुक्त आसरा दिला. सगळं काही उघड्या डोळ्यांनी पाहत अंगावर होऊ दिलं. कुणी केलं असतं असं? साक्षच काढायची झाली तर राजमाता जिजाऊसाहेबांच्या उद्यानात बेवारशी खितपत पडलेल्या लॉर्ड हार्डिंजसाहेबाला जाऊन विचारा. हा साहेब पूर्वी या द्वारावरच खडा होता.

जवळजवळ पन्नास वर्षं त्यानं हे उभ्याउभी भोगलं, सोसलं, पाहिलं. एक दिवस काळ उलटला आणि साहेबालाच तिथून उठवला आणि बागेत फेकून दिला. त्याचं एक सोडा, पण आता सध्या महाद्वाराच्या समोर छातीवर हात बांधून उभ्या असलेल्या स्वामीजींना किंवा भायखळ्याच्या खड्या पारशाला जाऊन पुसा. केव्हाही पुसा. त्या दोघांच्याही भव्य भालप्रदेशाखालच्या कमानदार भुवयांमधून नाकापर्यंत गंधासारखा उभा ठळक नाम उमटलेला दिसेल. ‘काय करायचं ते त्यांना खुशाल करू द्या हो. पाखरंच ती. मुकी बिचारी.’ असं ते मनातल्या मनात म्हणत असतील. अश्वारूढ छत्रपतींच्या जिरेटोपावरच्या तुऱ्यावर बसून या पाखरांनी गुटुर्रघुम्म करत अहर्निश ओल्या गंधाक्षता टाकल्या. घोड्याचे कान भरले. छत्रपतींनासुद्धा क्षणभर कसंसंच झाल्याची भावना झाली असावी. ‘गुटुर्र…’ आता बोला.

तसं पाहू जाता कबुतर-मंडळी माणूसघाणी दिसत नाहीत. उलट माणसंच त्यांना घाणेरडी, डोक्यावर बसणारी जात समजून पदोपदी हाशहुश्श करतात. बगळ्याच्या पंखासारखे पांढरे फेक कपडे करून भटकताना केव्हा तरी कोथिंबिरी रंगाचा बत्ताशाएवढा ठपका माणसाच्या धाकट्या मेंदूवरच्या कवटीवर ठपकतो. क्वचितप्रसंगी कपाळावर अष्टगंधाची शान आणतो. पण केव्हा तरी. कधी तरी. अधूनमधून. माकूनचुकून. अशा वेळी भाग्य फळफळणार या भावनेनं वेळ मारून न्यायची.

थोडा वेळ पोझिशन पंक्चरल्यासारखं वाटतं. बरं, हा ठपका कुठून ठपकला म्हणून वर तोंड करून पाहायची घाई केलीत तर पातळ सरबरीत मिश्र रसायन श्रीमुखावर पडतं. ना धड आत, ना बाहेर. दमसास होऊन वमनाचा भडाड सुरू होतो. पण हे क्वचित. तुम्हाला वर तोंड करून बघायला सांगितलं कुणी? पण कुतूहलापोटी हे घडतं खरं. पण त्यासाठी थोडी किंमत मोजावी लागते. म्हणून फुटपाथवर उभे असताना एखाद्या ‘आदर्श’ फरसाण मार्टच्या बोर्डाच्या बेचक्यात मादीच्या मोरपंखी गळ्यात तो चोच खुपसून तर गुर्रगळा फुगवून निवांत बसलेला असतो, अगदी अंतर्मुख होऊन, तेव्हा त्याला तसाच बसो द्यावा. तोंड वर करू नका म्हणजे झालं. नाही तर ओम्फस.

एकूण सहज निरीक्षण केल्यास असं समजून येतं की, या पाखरू-जमातीतही वर्णभेद असावेत. कारण असं दिसून येतं की, कबुतरं आपल्या शुभ्र मुलायम, मोतिया, किरमिजी रंगारूपांवरून स्वत:ला भलतीच उच्चकुलस्थ समजत असावीत. म्हणून ती कबऱ्या, राखाडी, पारव्या वर्णाच्या आपल्या जातभाईंना आपल्याहून नीच मानतात. जसे चित्तपावन देशस्थांना, चां. का. कुडाळदेशस्थ पाठारे परभांना वा त्वष्टा कासारांना मानताना दिसतात. कबुतरं जशी उडत्या स्पर्धात उतरताना दिसतात तशी पाखरं सहसा आढळत नाहीत. कबुतर लोकांचा असा दावा आहे की ‘त्यांचे पूर्वज आंतरराष्ट्रीय गुप्तपत्रव्यवहार नेआणीचा उडता कारभार पाहत असत; शिवाय आजच्या जगातही नवी पिढी एका पानाची ओली काडी चोचीत धरून शांततेच्या राजकारणाचं उडतं शुभ प्रतीक म्हणून मिजाशीत भराऱ्या मारताना दिसते. यात पिढीपरत्वे त्यांचा अभिमान आक्रमकता, अस्मिता पिसापिसांनी फुलारून आलेली आढळते.

पण पारवळ जमातीत या सर्व गोष्टीकडे तुच्छ नजरेनं पाहिलं जातं. तसं वागणं, करणं, फडफडणं हलक्या दर्जाचं, हीन अभिरुचीचं काम म्हणून सहसा वर्ज्य, त्याज्य मानलं जातं. म्हणजे कुणाच्या तरी चिठ्याचपाट्या कुठं तरी कुणाकडेही भरकटत नेऊन परत सुरळी करून घेऊन आणावयाच्या. याला काय काम म्हणायचं? शुद्ध भाडोत्रीपणा अथवा पिसाट चमचेगिरीचा एक नमुनेदार नीच निर्लज्जपणा आणि कसल्या तरी शांततेचं स्वत: चित्र बनून सफेदझूटपणा करत जगाला उडती शोभा दाखवायची यापरते नीचोत्तम काम कोणतं असू शकेल? हे सर्व पारवळांच्या एरवी नम्र (पारव्या रंगामुळे) पण प्रसंगी मानी स्वभावात बसणारं कसं असणार? त्यावर कबुतरांचा शहाजोग, पण पूर्वग्रहदूषित तिरका दृष्टिकोन असा दिसतो की केवळ काळ्याकबऱ्या रंगामुळे पारवळ जमातीला या अशा हमखास विश्वासू व मौलिक कामात सामावून घेणं इष्ट नसतं.

शिवाय पडक्या बुरुजावर नाही तर जुनाट विहिरींच्या सांदीत घुमत राहणाऱ्यांना आक्रमक पवित्रे माहीत नसतात किंवा तो त्यांचा स्वभावही नव्हे. केवळ आपला न्यूनगंड लपविण्यासाठी पारवळांनी कबुतरासंबंधी उठवलेली ही वर्णभेदाची व चमचेगिरीची धादांत घुमारेवजा खोटार्डी आवई आहे. या परस्परातील अंतर्गत किल्मिषामुळे या दोन्ही खग जमातींत (वस्तुत: एकच) बनावे तसे बनले नाही याचा सूड म्हणूनच की काय पारवळ नरांनी गोऱ्या, गोमट्या, मोतिया कबुतर-माद्या फूस लावून उडवल्या. कब्बूरनं मोतियाला घुलवली तर काळ्या लाल्यानं गोऱ्या फटक झटकलला फितवली म्हणून अलीकडच्या काळात पाहावं तिकडं एकच वर्णसंकर माजलेला आढळतो.

उगाच मधे खुपसायला कुणाची चोच नाही की तडजोडीला वाळकुटी शुष्क, निष्पर्ण फांदी गवसत नाही. आता पारवळ आणि कबुतरं एकच जात, जमात, सांप्रदाय होऊ पाहत आहे. काळच बदलला तेव्हा या वर्णसंकराला सौम्य सुधारकी स्वरूप आलं. हायब्रिड प्रत्यक्षात गावोगाव दिसू लागलं. मग दोन्ही जमातींनी ऐक्याची कल्पना मांडून बहिरी ससाण्याला एक नंबरचा शत्रू म्हणून ठरविण्यात आलं. नंबर दोनचा शत्रू घारूटी ऊर्फ मार्जार कंपनी. असं असूनही अंतर्गत कार्यकारणात दोघांनी आपापली अस्मिता शाबूत ठेवल्याचं दिसून येतं. एरवीच्या वरवरच्या कुरबुरी, फडफडाट हे जिवंतपणाचं लक्षण मानलं जावं अशीही त्या कल्पनेत तरतूद केली गेली. एक वेळ पाखरांचे स्वभाव बदलतील पण वर्ण कसा बदलणार? शुभ्र ते पांढरेफेक आणि काळे ते काळेकभिन्न.

कबुतरांना पाळायची टाप आहे, पण पारवळांना स्वतंत्रपणे आम्ही पाळतो असं म्हणायची माणसांची टाप नाही. त्यातून एखाद्यानं पारवळं पाळलीच तर तो बहिरी ससाण्याच्या अवलादीचा आहे असं खुश्शाल समजावं असं पारवळांचं म्हणणं. कबुतरं पाळणारी माणसं अनेक. हौस, मौज, शोभा, शर्यतीसाठी म्हणून. शांततेची प्रतीकं म्हणून उडवायची खानदानी कबुतरं खास दरबारी गोटात पाळली जातात. कबुतरांचं आणि माणसांचं तसं बरं असतं. आता गंमत अशी की, कबुतरखाना म्हणून मुंबईत ज्या जागा ओळखल्या जातात तिथं जादा करून उभयान्वयी जमात आढळते. कबुतरं, पारवळं यांचं जणू काही अद्वैतच तिथं नांदत असतं. कारण तिथं दोघांचा कॉमन इंटरेस्ट गुंतलेला असतो. एखाद्या लिलीबेननं उधळलेले दाणे अख्खा दिवसभर टिपायचे आणि दानाची पुण्याई तिच्या ओटीत घालायची. आम्ही मागितलं नाही आणि तुम्ही मात्र भरभरून दिलं. वर सोय अशी की कबुतरखाना तसा उघडावागडाच असतो. उडके आव, उडके जाव. एकदम खुल्ला. रोटीबरोबर बेटी व्यवहारही जमला तर जमून जातो. वाटलं टिपावं तर आले इथं. नको तर गेले उडत शहाजोगपणे. कसं? गुटुर्रर्र.

तसा या खगलोकांचा स्वभाव मिस्कीलच. जी.पी.ओ.समोरच्या प्रमेयात्मक तारांवर तिकीट काढल्यासारखे हारीनं, रुबाबात बसून पोटाच्या पाठीमागं धावणाऱ्या कर्मचाऱ्याकडे मनातल्या मनात गुटुर्र हसून ते नजरेच्या लाल गुंजा फेकतात. धावत्या माणसांच्या टाळूवरचे केस मोजू बघतात. एखादी बेलबॉटम वा बॅरलबॉटम पोरगी भलतीच चिकनी दिसली तर एका शिटात तिचा नखरा पार खलास करून टाकतात. पण या माणसांतही एखादा अवलिया भेटतो. तो आपल्या गळ्यात अडकवलेल्या डबड्याची कळ कच्कन दाबून या पाखरांची छबी उतरवतो आणि पेपरात चक्क छापवून आणून जगाला दाखवतो. पाहा हे ‘पाखरांचं प्रमेय’. डावीकडून उजवीकडे (ठोकून देतो.)

श्रीयुत लालू, श्रीमती मयूरी (पिसांत चोच खुपसून लगटून बसलेली.) चि. बाबूल (एका पायावर डोळे मिटून.) मागील रांग सौ. झंटकल, कुमारी गिरजी, कु. तुरतुरे, आजोबा लामतोरे (चोचपडके); अगदी पाठीमागे उडणारे खगेश, बहिरीकंदन वगैरे.

मुंबईच्या माणसांचं एक असतं. त्यांना म्हणे कामं फार. खाजवायला म्हणे फुरसत नसते. नेहमी नऊ एकूणसाठ, पाच छप्पन्नशिवाय वार्ता नाही. बघावं तेव्हा कोण तरी कुणाच्या मागं धावत असतो. इतकं असूनही वर नित्य नव्या कुणाबद्दलही काही तरी तक्रारी करत राहायचं. वेळ नाही असं एकीकडे म्हणायचं मग ही वचवच कशाला? जाता-जाता, बसता-बसता, पडल्या-पडल्या तोंड वाजवतील भें xx या मुंबईत कबुतरं वारेमाप. जावं तिथं फडफडतात. सारखा गुटुर्र गुटुर्र र्रर्र आवाज मारतात. सगळ्या साल्या पाखरांना बंदुकीच्या गोळ्यांनी फटाफट टिपलं पाहिजे. तो निषाद काही वेड xx नव्हता. या साल्यांनी त्याच्या झोपडीचं प्रसूतिगृह करून ठेवलं असेल म्हणून त्यानं एका सकाळी वरच्या वर एक टिपलं. करणार काय? पहिल्यांदा हाशहुश्श करून पाहिलं असेल तरी गुटुर्र र्रर्र र्र… ‘च्यामायला’ करून निषादानं मग बाण हाणला. मरा. त्याला काय ठाऊक, नर कुठला, मादी कुठली? ऋषीच्या बाचं काय जातंय ‘मा निषाद’ म्हणायला आणि क्रौंच झाला तरी काय? सत्ययुगातील ते सोवळं कबुतरच गुटुर्रर्र. शिवाय ही साली जिथं तिथं शिटशिंटून घाण करतात.

सुट्टीच्या दिवशी दुपारी निवांत डोळ्याला डोळा लागला तर यांचं आपलं गुटुर्रघुम्म चालूच. कामाच्या दिवशी ऑफिसात आढ्यावर तेच.’ अशा लाखो तक्रारी ऐकू येतील. वास्तविक अशा तक्रारीत तसा दम नसतो. मुद्दाम त्रास द्यावा अशी कबुतर मंडळीची इच्छा नसतेच मुळी. शक्य तर खोलीत किंवा कुठंही गुंजभर कसली हालचाल नाही याची बालंबाल खात्री करून घेऊनच आढ्यावरच्या बेचकीत निवांत थोडंफार हितगूज केलं तर काय बिघडलं? म्हणजे असं पाहा : ठाकुरद्वारला त्याच्या एका आडवाडीतल्या होस्टेलच्या पाचव्या मजल्यावरच्या एका खोलीत ऐन दुपारी त्रेपन्नसिंग – स्पेअरपार्टवाला दारं-खिडक्या सताड उघड्या टाकून आ करून पहुडला होता. पंखांचा शक्य तर फडत्कार न करता लालू आपल्या मयूरीसह खोलीतल्या आढ्याच्या कोनात जाऊन बसला.

चारपाच गुंजा नजरेच्या इकडं-तिकडं टाकून त्रेपन्नसिंगाचा अंदाज घेतला. तो जाम गोळी लागल्यासारखा पडला होता. म्हणून एकदोन गिरक्या घेऊन लालूनं मयूरीला इशारा केला आणि हितगूज आरंभलं. गुटुर्रर्र…र्रऽऽऽ. थोडी फडफड, धडपड उडाली. चार पिसं हवेवर तरंगली. धूळ पसरली. तत्क्षणी निद्राभंग पावलेला सरदारजी दाढा करकचून केकाटला, ‘‘…ए त्तेरी भेणकी छोऽरी. आऊट गेट यू बगर्स…’’ पण लालूनं न टरकता ‘गुटुर्र…’ केलं. म्हणजे न कळल्यासारखं. ‘आय बेग युवर पार्डन’ केलं अन् वर गिर्रेबाज गिरकी मारली. त्यासरशी सरदारजी उखडला. चेकाळून उठला आणि रावणानं जटायूचा वध केला त्या पवित्र्यात त्यानं एका दांडक्यानं नेम धरून फटका मारला. पिकलं फळ देठापासून पडावं तशी मयूरी घायाळ होऊन लवलव करत धरणीवर कोसळली. ‘मा निषाद’ म्हणायच्या आत सरदारजीच्या दुसऱ्या टिपिऱ्यात लालू सापडला. त्यालाही त्यानं झडपून पाडलं. दोन केविलवाण्या फडफडी झाल्या थोडा वेळ. त्या गतप्राण पाखरांकडे पाहून सरदारजीचं जिव्हालौल्य बळावलं.

बादलीभर गरम पाण्यात थोडा वेळ भिजत घालून त्यानं दोन्ही पाखरांची पिसं सोलून काढली. मग दोन लाल लाल गोळे धारदार सुरीनं साक्षेपानं चिरून काप काढले. विजेच्या शेगडीवर खरपूस भाजून मीठ-मसाल्यात घोळले. मग तब्येतीनं काटा-चमच्यानं पावाबरोबर मटकावले. तृप्त होत्सात्या त्या नर-ससाण्यानं हीऽ एवढी ढेकर दिली. स्वत:ची बोटं चाटली. आता काय म्हणावं या कर्माला? केवढं हे क्रौर्य! हा अघोरी दुष्टावा त्या निषादाच्या तर सोडाच, पण चौदा चौकड्यांचं राज्य करणाऱ्या त्या रावणाच्याही अंगी नव्हता. राक्षसाच्याही मनात माणूस कुठं तरी दडून असतो अन् माणसाच्या मनात अक्राळविक्राळ राक्षस दबून बसलेला असतो हे सत्य म्हणायचं का? जटायूचा वंश संपला हे ठीकच. एरवी ‘तंदुरी फ्राय जटायू’ ही टेसदार डिश एखाद्या पंचतारांकित हॉटेलात मेन्यू कार्डावर फडकली नसती का?

याउलट गिरगावातल्या एका बसक्या चाळीत आगळाच प्रकार घडला. कबुतरांच्या गिर्रेबाज नादावल्या स्वभावानं बबनराव एक दिवस भलताच स्फुरण पावला. गृहस्थ विलक्षण रसिक हे खरंच. तो या कबुतरावर भडकला तर नाहीच, उलट लोभावला. त्यानं सरळ कपडे केले. आणि पोष्टात जाऊन सासुरवाडीला बायकोच्या बापाला डबल एक्स्प्रेस तार ठोकली. ‘अंथरुणाला जाम खिळून आहे. चंचलेला असेल तशी धाडा.’ या तारेला उलट एक्स्प्रेस तार आली. ‘दाराला आतून बोल्ट लावला नाही तरी भागेल. खिडक्यांना जाळ्या मारून घ्या. – चंचला.’

एकदा काय घडलं : ऑपेरा हाऊसला एका नामवंत मासिकाची कचेरी आहे. तिथं दुपारच्या निवांत वेळी संपादक महाशय मजकुराचा गठ्ठा बाजूला ठेवून एक एक करून लिखाण वाचत बसले होते. त्यांच्या हातात ग्रामीण कथा असावी. कामाला लय लागली होती. अधूनमधून संपादकांची कळी खुलत-मिटत होती. पानं उलटता उलटता अचानक वरच्या आढ्यावरून छान कवडशाएवढा हिरवट पांढरा लोचदार ठपका कथेवर पचकला. कथेतील आशयाला ढका लागला. ती कथा धूसर, दुर्बोध वाटू लागली. त्यासरशी संपादकांनी आढ्याकडे कटाक्षानं पाहिलं आणि ‘च्या आयलाऽऽ’ असा उद्गार काढला. अन् हातातल्या कथेची चवड होती तशीच आढ्याच्या दिशेनं भिरकावली. फडफडाट झाला. पिसं पसरली. धुरळा उडाला. त्यातून उत्तर आलं ‘गुटुर्रर्र…’ म्हणजे ‘कथा ग्रामीण असली तरी तद्दन ग्राम्य व गर्हणीय आहे. निखालस अश्लील. सा. प.’ आणि ती पाखरं खिडकीवरच्या शटरमधून तिर्यक गतीनं भरारत पसार झाली.

तर एवंगुणविशिष्ट मुंबईतली कबुतरं. त्यांची बोली ज्याला जशी हवी तशी एकाच नादमय गिर्रेबाज शब्दाची. ती जशी वैतागदायी आहे तशीच चोखंदळ टीकास्वरूपही. वेळप्रसंगी एखाद्याला स्फुरण पावायलाही लावणारी. अधूनमधून ती तापदायी वाटली तरी खुद्द कबुतरं कुणाच्या ना अध्यात ना मध्यात असतात. आणि जर कदाचित तशी ती असतील तर क्वचित केव्हा तरी बत्ताशाएवढ्यापुरतीच. काही शौकीनबाज लोक त्यांना लाडेलाडे ‘पाखरू’ म्हणून संबोधत असतील; पण वेळवख्ताला फार तर जिवाला जीव देऊन राहतील. इतकी ती लाघवी अन् उपकारशील मनाची आहेत. इतकंच नव्हे तर ती अचूक औषधीही आहेत. हे कवणाच्याही ठाऊकी नसावं हे महदाश्चर्य. चरकानं अतिप्राचीन आयुर्वेदांग संहितेत अर्धांगकारिका लिहून ठेवली आहे. ‘कपोतरसर-शितलोहिमालावण्येना – (लावणे या अर्थी. इथं आर्षप्रयोग संभवतो.) तिगुणसंवर्धकोऽ-र्धांगपीडानाशकश्च लंघयतेचाऽपि…’ हे किती होमिओ वा अॅलोपथीवाल्यांना माहीत आहे?

अनुमानधपका नव्हे तर प्रत्यक्षप्रमाण म्हणून मिरजेच्या अर्धांगवेदविद्याभूषण पंचानन बुवा बाळेकुंद्रीकर यांनीच निर्वाळा देऊन ठेवला आहे. पंचानन बुवांचा गेली साठ वर्षं कपोत संप्रदायाशी जुना आणि जाणिता रक्ताचा संबंध आहे. त्यांनी ठाण्याच्या प्रभो गंडभीराचं दोन वर्षांचं अर्धांग तेरा दिवसांत ठिकाणावर आणून त्याला ‘लंघयते गिरिम्’ करून सोडला. प्रभो गंडभीराला जेव्हा झटका आला तेव्हा बाळेकुंद्रीकर शास्त्र्यांना मिरजेहून आणवण्यासाठी खास टेम्पो धाडला. आल्याआल्याच ‘‘नाडी कसली पाहता? ताबडतोब काळबादेवीला जाऊन कबुतरांच्या दोन शुभ्रवर्णी जोड्या आणवा.’’ म्हणून फर्मावलं.

दोन जोड्या आणल्या. शास्त्री बुवांनी झटक्यानं उपचार आरंभले. पिसं न उपटता एक जोडी (जोडपं) साक्षेपानं उलगडून शीर धरून चिरली अन् प्रभोच्या माथ्यावर लाल चबचबीत रक्तासह थापटली. त्यावर चुनखडीच्या पाकात मुरवून ठेवलेली आळवाची तीन पानं पसरून करकचून बांधली. बराच वेळ प्रभो धाय मोकलून ठणाणला. पण इलाज नव्हता. हाच एक अक्सीर इलाज होता. असा हा कोर्स सतत तेरा दिवस अथक चालला होता. चौदाव्या दिवशी प्रभो गंडभीर काहीच्या बाहीच ताळ्यावर आला. पंधराव्या दिवशी ताठ बरा झाला. आणि सोळाव्या दिवशी कोटात आपल्या कामावर रुजू झाला.

जसे आले तसेच निघून जाताना अर्धांगवेदविद्याविभूषणांनी स्वत: गुदुर्रर्रर्र…घुम्म असा आवाज केला. याचा गर्भितार्थ असा की, आयुर्वेदाङ्गासंहितेत अर्धांगकारिकेला जो पुरवणीवजा शुद्ध पाठ जोडलेला आढळून येतो तो पंचानन शास्त्री बाळेकुंद्रीकरकृत होय. तो पाठ असा :

…तथापिच खण्डित नरौ वा माद्यौप्यवलिप्येन एकानुकारित्वात् हानिकारकौ रक्तभेदात् दोषास्पदश्च न तु एकोऽपि कपोतदाम्पत्यखण्डितेनैव लावण्येन कामधुक् भवत्येति।

म्हणजे कापायची जोडी नर आणि मादी असावयास हवीत. दोन्ही नर वा दोन्ही माद्या एकाच वेळी चिरल्यास त्यांच्या रक्ताचे ग्रुप बदलल्यानं व कुणाही एकाच्या विरहतापानं अचूक गुण येईलच याची हमी देता येणार नाही.’

असा साक्षात्कार पंचानन शास्त्रीबोवांना एका भल्या उष:काली, पाखरूबोलीचा सखोल अभ्यास केल्यामुळे, ती नीट उमजू लागल्यावरच झाला. गुटुर्रर्रऽऽ.

इति पाखरूप्रमेयात्मक फलश्रुती जाणावी.

(‘संजारी’मधून साभार.)

‘गुटुर्रघुम्म’ या ‘लोकसत्ता’तील लेखामध्ये भर घालून पानवलकरांनी ‘पाखरांचं प्रमेय’ हा लेख लिहिला.

lokrang@expressindia.com





Source link

फलटणच्या कॅनॉल परिसरालाही बारामतीच्या धर्तीवर सुशोभीकरणाची भेट

0
फलटणच्या कॅनॉल परिसरालाही बारामतीच्या धर्तीवर सुशोभीकरणाची भेट

फलटण :फलटण शहराच्या विकास आराखड्यात महत्त्वाची पायरी म्हणून निरा उजवा कालवा परिसराचे आकर्षक सुशोभीकरण होणार आहे. अनेक दिवसांपासून नागरिकांची ही मागणी होती. अखेर आमदार सचिन पाटील यांनी या कामाला गती देत फलटणलाही बारामतीप्रमाणेच नवा चेहरा मिळणार असल्याचे जाहीर केले.

बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून झालेले सुशोभीकरण राज्यात आदर्श ठरले आहे. त्याच धर्तीवर फलटण शहरात देखील डांबरीकरण, कॅनॉलचे अस्तरीकरण आणि आकर्षक पद्धतीने उभारणी होणार आहे. काल यासाठी बारामती कॅनॉल परिसराची पाहणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

योजनेअंतर्गत जिंतीनाका ते रावरामोशी पूल या भागात दोन्ही बाजूंनी डांबरीकरण, पाथवेवर पेविंग ब्लॉक, वृक्षारोपण, लहान मुलांसाठी अत्याधुनिक उद्यान, ओपन जिम, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची बाकडी, आकर्षक पथदिवे यांची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे फलटण शहराला वेगळेपण आणि नवा देखावा मिळेल.

“ज्यांनी मला निवडून दिले त्यांच्या अपेक्षा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व महायुतीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करणार,” असे मत आमदार सचिन पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

या पाहणी दौऱ्यात धोम बलकवडी व नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता बोडके, गपाट साहेब, कोकरे साहेब, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, गटनेते अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, तुकाराम शिंदे, सिराजभाई शेख, अमोल सस्ते, रणजीतबाबा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

जि.प प्राथ.शाळा पाटणेवाडी येथे भीमराव कांबळे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

0
जि.प प्राथ.शाळा पाटणेवाडी येथे भीमराव कांबळे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण


फलटण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटणेवाडी केंद्र – खुंटे ता.फलटण जि.सातारा येथे 79 व्या स्वतंत्र्यदिनानिमित्त सीआरपीएफ चे फौजी हवालदार श्री.भीमराव कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना स्वतंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला.भीमराव कांबळे हे याच शाळेचे विद्यार्थी असल्याने शाळेसाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. आपणही याच शाळेत शिकल्याचा आपल्याला अभिमान वाटत असून शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक अतिशय चांगल्या प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहेत हे बघून समाधान वाटल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर व्यायाम सुद्धा केला पाहिजे. 27 वर्षांपूर्वी याच शाळेमध्ये मीही शिक्षणाबरोबर व्यायाम करून सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहिलं होतं आणि ते मी प्रत्यक्षात उतरवलं. तुम्हीही आपल्या भारत मातेची सेवा करण्यासाठी सर्वांनी तत्पर राहिलं पाहिजे.अशी आशा व्यक्त करून तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटणेवाडी येथील विद्यार्थी गेल्या दोन वर्षांमध्ये मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत निवडली जात आहेत. त्यामध्ये सन २०२४ साली कैवल्य विजय बोरावके, सन २०२५ साली ईश्वरी गणेश पवार व प्रणव प्रशांत जगताप यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.या परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. कैवल्य विजय बोरावके यांनी राज्यस्तरावरती 14 वी, विभागीय स्तरावरती 9 वी तर केंद्र स्तरावर चौथी रँक प्राप्त केली आहे.ईश्वरी गणेश पवार हीने राज्यस्तरावर 6 वी, विभागीय स्तरावर 1 ली रँक प्राप्त केली आहे. प्रणव प्रशांत जगताप यांनी राज्यस्तरावर 15 वी, विभागीय स्तरावर 10 वी तर केंद्र स्तरावर 5 वी रँक प्राप्त केली आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप ही करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विशाल शंकर हाळनोर, उपशिक्षक मतीन महंमदअली शेख,
अंगणवाडी सेविका शोभा गोरख जाधव, अंगणवाडी मदतनीस दीपा भोसले व
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल सर्जेराव भांडवलकर, युवा कार्यकर्ते श्रीकांत भांडवलकर आणि गणेश काळे, पालक शिक्षक ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एमएमआरमध्ये दुबईपेक्षाही मोठे, सुंदर शहर वसवू – मुख्यमंत्री

0
एमएमआरमध्ये दुबईपेक्षाही मोठे, सुंदर शहर वसवू – मुख्यमंत्री



मुंबई : पालघरमध्ये वाढवण बंदरालगत चौथी मुंबई तर अटल सेतूच्या पायथ्याशी तिसरी मुंबई वसविण्यात येणार आहे. ही नवीन शहरे वसविण्यासाठी विकासकांनी राज्य सरकारला सहाकार्य करावे. त्यांना आवश्यक ती मदत सरकार करेल. दोघांच्या सहकार्याने एमएमआरमध्ये येत्या १० वर्षांत दुबईपेक्षाही सुंदर असे मोठे शहर वसवून दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. वांद्रे-कुर्ला संकुल येथील क्रेडाय-एमसीएचआय आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

देशातील पहिले सर्वात मोठे आणि जगातील पहिल्या १० क्रमांकात मोडणारे बंदर वाढवण येथे उभारले जाणार आहे. या बंदरामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. तर या बंदरामुळे विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे. या बंदराशी एमएमआरला जोडण्यासाठी उत्तन – विरार सागरी सेतूचा विस्तार विरार ते पालघर, वाढवण बंदर असा केला जाणार आहे. त्यामुळे वाढवण बंदरावर पोहचणे सोपे होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. या बंदरामुळे निर्माण होणाऱ्या संधी लक्षात घेता वाढवण बंदरालगत चौथी मुंबई वसविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून चौथी मुंबई वसवली जाणार आहे.

तर दुसरीकडे अटल सेतूमुळे मुंबईतून नवी मुंबईत, तसेच नवी मुंबई विमानतळावर अवघ्या काही मिनिटांत पोहचणे शक्य होऊ लागले आहे. त्यामुळे अटल सेतू प्रभावित क्षेत्रात निर्माण होणारी संधी लक्षात घेता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून तिसरी मुंबई वसविण्यात येत आहे. या चौथ्या आणि तिसऱ्या मुंबईच्या माध्यमातून एक चांगले शहर वसविण्यासाठी क्रेडाय-एमसीएचआयमधील विकासकांनी सरकारला सहकार्य करावे.

तिसऱ्या मुंबईसाठी तुम्ही पुढे आलात, तर एमएमआरडीए आणि विकासक यांच्या संयुक्त भागिदारीतून तिसरी मुंबई वसविणे सोपे होईल. विकासकाला २४ टक्के, तर एमएमआरडीएला ७६ टक्के हिस्सा देण्यात येईल. सरकार परवनाग्या, भूसंपादनासाठी आवश्यक मदत करेल. ही संधी आहे, तुम्ही पुढे या आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे अगदी दुबईपेक्षाही सुंदर आणि मोठे शहर वसवू, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

यामुळे चौथी आणि तिसरी मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र होणार आहे. त्याचबरोबर एमएमआरमध्ये सागरी मार्ग, सागरी सेतू, भुयारी मार्ग, मेट्रो अशा अनेक प्रकल्पांमुळेही एमएमआरमध्ये विकासाच्या संधी निर्माण होणार आहेत. जेव्हा भारताची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डाॅलर्स बनविण्याचा विषय येतो तेव्हा यात महाराष्ट्राचा हिस्सा १ लाख कोटी डाॅलर्स असेल असे म्हटले जाते. पण केवळ एमएमआरची क्षमता १.५ लाख कोटी डाॅलर्स अर्थव्यवस्थेची आहे, असा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. नव्या विचारांने, नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण हे करू शकतो, तसा संकल्प आपण आज करू या, असेही ते म्हणाले.



Source link

सनी DJ चे मालक, कर्तृत्ववान व मनमिळावू सनी काकडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

0
सनी DJ चे मालक, कर्तृत्ववान व मनमिळावू सनी काकडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

फलटण – महात्मा फुले नगर येथील शांत, संयमी, कर्तृत्ववान आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे सनी DJ चे मालक सनी सुनिल काकडे यांचे आज शनिवार दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सनी काकडे हे DJ  चालक मालक संघटनेमध्ये अतिशय प्रेमळ , लोकप्रिय व्यक्तीमत्व होते DJ च्या क्षेत्रात सो कर्तुत्वावर स्वतःची अशी ओळख निर्माण केली होती Djच्या दुनियातील राजा माणूस असणारा  तरुणांमध्ये लोकप्रिय, मनमोकळे आणि नेहमी मदतीस तत्पर राहणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनामुळे महात्मा फुले नगर व फलटण शहरात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पार्थिवावर अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी  मित्रपरिवार, नातेवाईक आणि नागरिक उपस्थित  असून, अंत्ययात्रा दुपारी ३.०० वाजता महात्मा फुले नगर येथून निघणार आहे.

सनी काकडे यांच्या आठवणी कायमच फलटणकरांच्या मनात जिवंत राहतील.

साहस Times कडून भावपूर्ण श्रद्धांजली