
मोदी म्हणाले माझ्यासाठी केवळ चारच जाती आहेत, नारीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी व गरीब जनता.या चार जातींनी भाजपच्या योजना आणि भाजपच्या रोडमॅपबद्दल खूप उत्साह दाखवला. या विजयात प्रत्येक महिला, गरीब, शेतकरी, तरुण, आपला विजय पाहत आहेत. प्रत्येकजण या विजयाला स्वतःचा विजय मानत असून हा प्रत्येक मतदार भारताला २०४७ मध्ये विकसित देश म्हणून पाहतोय. मी आज प्रामुख्याने महिलांचे आभार मानेल. भाजपला विजयी करण्याचे महिलांनी मनावर घेतले. महिलांची सुरक्षा, महिलांचा सन्मान फक्त भाजपच करेल, हे प्रत्येक महिलेला चांगलेच माहिती आहे.







