
मराठा कुटुंबियांना कुणबी जातप्रमाणपत्र देऊ नये, यासाठी छगन भुजबळ यांच्यासह राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी जालन्यातल्या आंबड येथे ओबीसी एल्गार मोर्चा काढला. यानंतर ओबीसी एल्गार सभा देखील घेतली. या सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांचा एकेरी उल्लेख केला. याशिवाय, त्यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य देखील केले. छगन भुजबळ यांच्या या वक्तव्याने चांगलाच पेट घेतला असून अनेक मराठा समाजातील नेत्यांनी त्यांच्या टीकेला विरोध दर्शवत आहेत.










