
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे आणि सगेसोयरे अंमलबजावणी झालीच पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहेत. आधीच ६२ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. आरक्षण ५० टक्क्यांच्या आत येऊच शकत नाही. सरकार मराठा समाजाला किती टक्के आरक्षण देते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. आरक्षण रद्द झाले तर आम्हाला आंदोलन करावे लागेल. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र हवे आहे. आम्ही ओबीसीच आहोत, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.










