
[ad_1]
48 तासांमध्ये इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा समोर येणार असल्याचा दावा कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी वक्तव्य केले आहे.
दिल्ली : संपूर्ण देशासह अनेक देशांचे लक्ष हे भारताच्या निवडणुकीकडे लागले आहे. उद्या (दि.01) देशातील अंतिम सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यंदाची लोकसभा निवडणूक आणि प्रचार जोरदार झाला आहे. एनडीए आघाडीविरुद्ध देशातील सर्वच विरोधकांनी मोट बांधत लढा दिलामात्र इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. 48 तासांमध्ये इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा समोर येणार असल्याचा दावा कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी वक्तव्य केले आहे.
देशातील विरोधकांनी एनडीए आघाडीला शह देण्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करत निवडणूक लढवली. एनडीए आघाडीकडून नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर असला तरी इंडिया आघाडीकडून कोण उमेदवार असेल याबाबत स्पष्टता नव्हती. इंडिया आघाडीच्या निवडणूकीपूर्वी झालेल्या अनेक बैठकांमध्ये देखील पंतप्रधानपदाचा चेहरा ठरवण्यात आला नव्हता. मात्र येत्या 48 तासांमध्ये इंडिया आघाडीचा उमेदवार समोर येणार असल्याचा दावा जयराम रमेश यांनी केला आहे.
[ad_2]
Source link


