
Kolhapur tavandi ghat Accident : राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. धुळे येथील अपघातात पाच जण ठार झाल्याची घटना ताजी असतांना कोल्हापुरात पुन्हा भीषण अपघात झाला आहे. रात्रीच्या सुमारास कोल्हापुरच्या निपाणी जवळील तवंदी घाटात हा भीषण अपघात झाला असून एका भरधाव कंटेनरने ७ ते ८ वाहनांना धडक दिली. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले तर, ६ जण गंभीर जखमी आहेत. हा कंटेनर बेळगावहून कोल्हापूरला जात होता. या घटनेत वाहनांचा चक्काचूर झाला आहे. चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्यानं ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे.