
राज्य मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि व्होकेशनल शाखेची बारावीची परीक्षा १९ मार्चपर्यंत चालणार आहे. मात्र, आतापर्यंत २३४ गैरप्रकाराच्या घटना घडल्या आहेत. २०२३ मध्ये परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी २४७ गुन्हे दाखल करण्यात आले.