
घटनास्थलावरून मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव ट्रक अनियंत्रित झाल्याने पायी पालखीत घुसला. चालकाने डुलकी लागल्याने हा अपघात झाला. शिर्डी येथील श्री महंत काशीकानंद महाराज यांची साई पालखी दिंडी देवाची आळंदी येथे जात होती. पालखीत कंटेनर घुसल्याने दोन भाविक जागीच ठार झाले तर १० जण जखमी झाले आहेत.




