‘महाराष्ट्राला सहन होणार नाहीत अशी वक्तव्ये दोन्हीकडून होत आहेत ते परवडणार नाही’

0
3


Ajit Pawar : सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सहन होणार नाहीत अशा प्रकारची वक्तव्य फक्त एकाच बाजूने नव्हे, तर दोन्हीकडून होत आहेत आणि ते महाराष्ट्राला परवडणार नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कराडमध्ये प्रीती संगमावरून राज्यातील वाचाळांना कानपिचक्या दिल्या. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, असा टोला सुद्धा अजित पवार यांनी लगावला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अजित पवार यांनी प्रीतीसंगमावर जाऊन समाधीस्थळी दर्शन घेतले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी राजकीय वाचाळवीरांना फटकारले.

यशवंतरावांच्या विचारधारनेचं भलं होणार 

अजित पवार म्हणाले की यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्यानंतर ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केलं त्यांनी जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जाती जातीमध्ये समाजामध्ये भेदभाव केला नव्हता. या सगळ्या बाबी विचारात घेऊनच आम्ही अर्थसंकल्प मांडल्याचे अजित पवार म्हणाले. जोपर्यंत मी राजकीय जीवनामध्ये आहे तोपर्यंत यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय विचार सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. चव्हाण यांच्या विचारधारेनेच महाराष्ट्राचे भलं होणार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्यांनी कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

मंत्री कोणाला करणार? अजित पवारांनी बोलणं टाळलं

देशासह महाराष्ट्रावर प्रेम करणारा मोठ्या संख्येने मुस्लिम समाज देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत देखील मुस्लिम मावळे होते. त्यामुळे नितेश व्यक्त नितेश राणे यांचे वक्तव्य काय होतं, त्या मागचा हेतू काय होत आहे मला माहित नसल्याचं अजित पवार म्हणाले. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या जागी मग कोणाला मंत्री आहात काय केलं जाणार याबाबतीत मात्र अजित पवार यांनी बोलणं टाळलं. 

हेदेखील वाचा

अधिक पाहा..





Source link