महाबोधी महाविहार कायदा 1949 रद्द करा – ॲड. आंबेडकर

0
3
महाबोधी महाविहार कायदा 1949 रद्द करा – ॲड. आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन जाहीर

मुंबई : बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध समाजाकडे देण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. महाबोधी महाविहार कायदा, 1949 रद्द करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

बौद्ध धम्माच्या या पवित्र स्थळी बौद्ध समाजाचे पूर्ण नियंत्रण नसणे, हा अन्याय आहे, असे मत व्यक्त करत ॲड. आंबेडकर म्हणाले, “बौद्ध समाजाच्या हक्कांसाठी आम्ही लढा देणार असून, हा अन्याय दूर करण्यासाठी संपूर्ण समाजाने एकत्र यावे.”

या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. १२) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि 1949 चा कायदा रद्द करण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.

📌 हायलाइट्स:

महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा – वंचित बहुजन आघाडीची मागणी
महाबोधी महाविहार कायदा 1949 रद्द करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन
बौद्ध समाज आणि न्यायप्रिय नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर