
Maharashtra IMD Weather News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाला आहे. थंडी गायब झाली असून कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यात ढगाळ हवामान असल्याने उकाडा देखील वाढला आहे. गेल्या काही दिवसांत कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. सकाळी थंडी तर दुपारी उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. येत्या काही दिवस राज्यात वातावरण कोरडे व ढगाळ राहणार असून तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.