
..तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल- मोदी
महाराष्ट्रात निवडणूक प्रचारासाठी केवळ एक आठवड्याचा कालावधी राहिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे दौरे वाढले आहेत. योगींची’बटोगे तो कटोगे’ आणि मोदींच्या’एक हैं, तो सेफ हैं’ या घोषणांही गाजताना दिसत आहेत. आज पुण्यातील सभेत मोदी म्हणाले की, जर आपण एक राहिलो नाही, तुमची एकजूट तुटली, तर सर्वात आधी काँग्रेस तुमचे आरक्षण हिरावून घेईल. देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडत आहे. समृद्धी कायम राहावी यासाठी आपण एकसंध राहायला हवे. या देशातील १० टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. काँग्रेसला त्यांना जातींमध्ये विभाजित करायचे आहे, जेणेकरून ते त्यांना कमकुवत करू शकतील. जर आदिवासी समाजात फूट पडली, तर हे लोक त्यांची ओळखच नष्ट करतील. आरक्षण संपवण्याचे वक्तव्य काँग्रेसच्या युवराजांनी परदेशात केले आहे. हेच त्यांचे कारस्थान आहे. त्यापासून स्वतःला वाचूवायचे असेल तर तुमची एकजूट म्हत्वाची आहे.