
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमधील झालेल्या जोरदार राड्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. मालवणमधील राड्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या राड्याबद्दल नारायण राणे म्हणाले की, आम्ही काहीही केले नाही. आम्ही राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी गेलो होतो. आम्ही खाली येत असताना ते वर किल्ल्यावर जात होते. तेव्हा त्यांचे लोकच आमच्या अंगावर आले. आम्ही काहीच केले नव्हते. तुम्हाला आमचा इतिहास माहिती नाही का? आम्हाला काही करायचे असतं तर आम्ही चिरीमिरी करत नाही. एकही घरापर्यंत पोहोचू शकला नसता. असे नारायण राणे यांनी म्हटले.