
प्रकाश महाजन यांचीही टीका
मनसेचे प्रकाश महाजन यांनीही मिटकरी यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. अजित पवार गटाला महायुतीतून बाहेर पडायचं आहे. त्यासाठी ते कारणं शोधत आहेत. मिटकरी हे राज ठाकरेंना सुपारीबाज म्हणतात. त्याच्याकडं काय पुरावा आहे? सुपारीबाज तर अजित पवार आहेत. त्यांच्यावर खुद्द पंतप्रधान मोदी यांनी आरोप केले आहेत. लोकसभेला मनसेची मदत घेतली तेव्हा तुम्हाला राज ठाकरे सुपारीबाज वाटले नाहीत का, असा सवाल महाजन यांनी केला. आमच्या कार्यकर्त्याच्या मृत्यूची जबाबदारी अजित पवारांची आहे. अमोल मिटकरी, उमेश पाटील आणि अजित पवार यांच्यावर राज्य सरकारनं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली.