
मुंबईत पावसाचा जोर वाढला
ठाणे, मुंबई, कल्याण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी रेल्वेट्रॅक वर पाणी साठले असून या मुळे लोकल ही धीम्या गतीने पुढे जात आहे. मुंबईला आज हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडण्या पूर्वी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गरज असेल तरच बाहेर पडा किंवा वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.





