
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे रिसर्च फेलो, प्रथम लेखक आशिष गुप्ता म्हणाले, “मागासवर्गीय गटाचे आयुर्मान आधीच कमी होते. कोरोनामुळे देशातील भीषण परिस्थिती पुढे आली. यामुळे देशातील उच्च गट आणि कनिष्ठ गटातील दरी ही आणखी वाढत गेली. भारतातील मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तरूणांची आणि वृद्ध नागरिकांची संख्या सर्वाधिक होती. तर उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांच्या मृत्यूंची संख्या सर्वाधिक होती. ते म्हणाले की, कोविड-१९ बाधित काही भागातील मुलांचे देखील सर्वाधिक मृत्यू झाले. साथीच्या रोगाचा आणि लॉकडाऊनचा अप्रत्यक्ष परिणाम, बिघडत चाललेली आर्थिक परिस्थिती आणि सार्वजनिक आरोग्य सेवांच्या अपुऱ्या सोई हे देखील मृत्यूंची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरल्याचे या संशोधनात म्हटले आहे.