
सौमित्र लग्न करणार?
सौमित्र, हृषिकेश आणि जानकीला सांगतो की, ‘उद्या मी लग्न करत आहे. तिच्याकडून तिचे आई-बाबा आणि त्यांच्या कुटुंबातील काही मित्रमंडळी येणार आहेत. माझ्या बाजूने तुम्ही दोघे येणार ना?’, असं म्हणत तो दोघांनाही आपल्या लग्नाला हजर राहण्यासाठी सांगणार आहे. मात्र, सौमित्रचा हा निर्णय ऐकून जानकी आणि हृषिकेश यांना मोठा धक्का बसला आहे. जर, आपण सौमित्रला साथ दिली, तर वडिलांच्या वचनाचा अपमान होईल, याची दोघांनाही चांगलीच कल्पना आहे. त्यामुळे जानकी आणि हृषिकेश यांना कुठलही पुढचं पाऊल उचलताना विचार करावा लागणार आहे. मात्र, सौमित्रच्या लग्नामुळे आता जानकी आणि हृषिकेश चांगलेच गोत्यात येणार आहेत.








