
अर्जुनला वाचवण्यासाठी चैतन्य उचलणार कठोर पाऊल
बार काऊंसिलच्या पुढ्यात आता पुन्हा एकदा अर्जुन संतापताना दिसणार आहे. मात्र, यावेळी चैतन्य त्याला शांत करणार आहे. बार काऊंसिलने दोघांनाही स्वतःवरील आरोप खोडून काढण्याची एक संधी दिली आहे. यानंतर सगळेच घरी परतणार आहे. मात्र, घरी परतलेल्या सुभेदारांना आता मोठा झटका बसणार आहे. अर्जुनची वकिली रद्द होऊ नये म्हणून, चैतन्यने सगळे आरोप आता स्वतःवर घेतले आहेत. आपण या सगळ्याला जबाबदार असून, यात अर्जुन सुभेदार याचा काहीही संबंध नसल्याचे चैतन्यने पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे. त्यामुळे आता सगळ्यांनाच धक्का बसणार आहे.








