
दिग्दर्शकाने सांगितले चित्रपटाविषयी
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गोविंद वराह म्हणतात, “निरागसता, तंत्रज्ञानाविषयी लहान मुलीचे असणारे ज्ञान, समजूतदारपणा, संकटांशी झुंज असा रोमांचक आणि मनोरंजनात्मक असा हा प्रवास आहे. मुळात चित्रपटाच्या नावावरून हा चित्रपट तंत्रज्ञानाशी संबंधित आहे, याचा अंदाज आला असेलच. परंतु या तंत्रज्ञानाचा वापर कसा केला आहे, हे पाहाणे उत्कंठावर्धक ठरणार आहे.”
वाचा: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील कलाकाराचा १६ वर्षांनी मालिकेला रामराम, चाहत्याची पोस्ट








