
रेवतीच्या जीवाची धमकी दिल्याने लीलाला अभिरामशी जबरदस्ती लग्न करण्यासाठी तयार झाली होती. ती स्वतः देखील या लग्नासाठी तयार नव्हती. मात्र, आपल्या बहिणीचा जीव धोक्यात आहे, हे पाहून लीला लग्नाला तयार झाली. मात्र, तिच्या वागण्याचा सगळ्यांनाच धक्का बसला. लीलाच्या वागण्यामुळे अभिराम देखील प्रचंड संतापला आहे. त्याने लग्न विधी तर पूर्ण केले. मात्र, लीलाची पुन्हा तिच्या माहेरी पाठवणी केली होती. आपला मुलगा सुनेशी असा वागतोय, हे बघून सरोजिनी आजीला खूप वाईट वाटलं. मात्र, आता त्यांनी लढवलेली शक्कल कामी येणार आहे. अभिरामला लीलाला जहागीरदारांच्या घरी घेऊन जावंच लागणार आहे.








