
वायव्य भारतात सोमवारपासून उष्णतेची लाट सुरू होण्याची शक्यता असून पुढील पाच दिवस पूर्व भारत आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मान्सून मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात सक्रीय झाला आहे.