
आज, बुधवारी राज्यातील औरंगाबाद, मोतीहारी, सिवान, शिवहर, पाटणा, बेगूसराय, मुंगेर, जमुई, बांका जिल्ह्यात शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक बेशुद्ध पडल्याच्या बातम्या आल्या. या घटनांमुळे विरोधकांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर टिकेची झोड उठवली आहे. तीव्र उन्हाळ्यासारखे संकट हाताळण्याची सरकारची पद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.