
२००७मध्ये ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये सहभागी झालेल्या अक्षय खन्नाने म्हटले होते की, सुरुवातीला मी टक्कल पडणे आणि केस गळणे याकडे दुर्लक्ष केले होते. पण १० वर्षांनंतर, त्याने आपल्यामध्ये किती फरक पडला हे उघड केले. या टक्कल पडण्याचामुले आपल्यावर आणि आपल्या करिअरवर किती परिणाम झाला आहे, याची कुणी कल्पनाही करू शकत नाही, असे तो म्हणाला. खुद्द अक्षयला हे मान्य करायला दहा वर्षे लागली. अभिनेता म्हणाला, ‘याची सुरुवात अगदी लहान वयात झाली होती. माझ्यासाठी अकाली टक्कल पडणे म्हणजे पियानोवादकाची बोटे गमावल्यासारखे होते. त्या दिवसांत मला खरंच तसं वाटलं होतं…जसं घडत होतं. तसं मी याकडे फार कमी लक्ष देत होतो. नंतर यामागची तीव्रता कळली.’