
दिल्ली सरकारमधील मंत्री आतिषी व अन्य नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. भाजपनं केजरीवाल यांच्या विरोधात कसं कटकारस्थान रचलं याचा खुलासा त्यांनी केला. ‘ईडी आणि सीबीआय गेल्या दोन वर्षांपासून दिल्लीतील कथित घोटाळ्याची चौकशी करत होती. या सगळ्या काळात पैसे कुठून आले आणि कुठे गेले याचीच चर्चा होत होती. मात्र, आपच्या कुठल्याही मंत्र्याकडून, नेत्याकडून किंवा कार्यकर्त्यांकडून एक पैसाही तपास यंत्रणांना मिळाला नाही, असं आतिषी म्हणाल्या.






