
या अध्यासन केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा युद्धातील पराक्रम तसेच त्यांचा राज्य कारभार, देशातील विविध भागातील परकीय आक्रमण मोडून काढत स्वकीय राज्य उभारण्यास केलेले योगदान, त्यांच्या राजकीय तत्वज्ञानाचा आणि राज्य कारभाराचा देशाच्या राजकारणावर आणि समाजमनावर झालेला परिणाम, महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य, व्यवस्थापनाची तत्वे, शिक्षण, संस्कृती, मंदिरे, व्यापार, त्यांचे राज्य कारभारातील तत्वज्ञान, त्यांनी उभारलेली सुसंघटित प्रशासकीय यंत्रणा, स्व-भाषेला राज्य कारभारात दिलेले महत्व, परराष्ट्र धोरण, शेती, जलसंधारण आणि सिंचन, गाव वस्त्या व शहरांचे व्यवस्थापन आणि नियोजन, संरक्षण यंत्रणा या सर्व बाबतीतले धोरणे व व्यवस्थापन, परकी आक्रमकांबाबतचे धोरण, संत महात्म्यांबाबतचे धोरण अशा विविध अंगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा आणि राज्यकारभाराचा अभ्यास होणार आहे.





