
आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीत मार्चोसाठी येऊ पाहणाऱ्या पंजाबच्या शेतकऱ्यांना हरयाणा-पंजाबच्या सीमेवर रोखून धरण्यात आलंय. आता या शेतकऱ्यांनी पुन्हा बुधवारी ‘दिल्ली चलो’ची घोषणा दिली आहे. शेतकरी दिल्लीत येऊ नये यासाठी पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवर कडक बंदोबस्त ठेवला आहे. आंदोलनामुळे दिल्लीत वाहतूक कोंडीची समस्या होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिल्ली- हरियाणीदरम्यानच्या टिकरी, सिंघू आणि गाझीपूर सीमेवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.







