
प्राथमिक माहितीनुसार, कटला हे एका लग्न समारंभातून बाहेर आल्यावर नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला, ज्यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर त्यांना तातडीने विजापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.









