
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांचे बोलविता धनी शरद पवार व उद्धव ठाकरे हेच असल्याचा आरोप केला होता. यावर शरद पवारांनी जोरदार पलटवार केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या जबाबदारीच्या पदावर बसलेली लोकं इतकं पोरकट बोलतात, हे महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात कधीच पाहिले नव्हतं, असा टोला पवारांनी लगावला. मनोज जरांगे प्रकरणात जी काही एसआयटी चौकशी करायची आहे, ती करा. आमची काही हरकत नाही. आमचे आणि जरांगे पाटील यांचे फोन तपासा, असे शरद पवार यांनी म्हटले.






