
ईशान्य भारतात समुद्रसपाटीपासून १२.६ किमी उंचीवर १६५ नॉट वेगाने वारे वाहतील, असे आयएमडीने म्हटले आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये शुक्रवार आणि शनिवारी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस देशाच्या उत्तर भागात किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.