
तन्वीच्या घरात तिच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरू आहे. तन्वीचा साखरपुडा विपुलशी होणार आहे. रविराज आणि सुमन यांनी आपल्या लेकीचा साखरपुडा लगेच करायचा ठरवला. मात्र, यामुळे प्रियाचा डाव फसणार होता. प्रियाला सायली आणि अर्जुन यांच्या नात्यात वितुष्ट आणून, अर्जुनसोबत संसार थाटायचा आहे. प्रियाचा साखरपुडा होणार असल्याचे कळताच आता अस्मिता तिला फोन करून खिजवणार आहे. तू आता विपुलशी साखरपुडा केलास, तर अर्जुनला कसं मिळवणार?, असा प्रश्न अस्मिता प्रियाला करणार आहे. यावर वैतागलेली प्रिया आता हा साखरपुडा होऊ नये, म्हणून एक नवा खेळ खेळणार आहे.







