
निवडणूक आयोगावर टीका करतांना आयोगावर टीका करतांना शरद पवार म्हणले, राजकारणामध्ये पक्ष उभे राहतात काहीजण पक्ष सोडून जातात, ही प्रक्रिया चालू राहते. मात्र, ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्षच काढून दुसऱ्याला दिला असे देशात कधीच घडले नाही. नुसता पक्षच दिला नाही तर खूण, चिन्ह सुद्धा दिले. हा निर्णय कायद्याला धरून आहे असे, वाटत नाही या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. संपूर्ण देशाला माहित आहे की, राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कुणी केली. तरी सुद्धा पक्ष दुसऱ्यांना देणे हा अन्याय आहे. आयोगाचा हा निर्णय अन्यायकारक आहे. विधानसभा अध्यक्ष वेगळा निर्णय देणार नाही, याची खात्री होती, असेही पवार म्हणाले.










