Political News | ‘महाराष्ट्रात न्याययात्रा पोहोचेपर्यंत किती नेते पक्ष सोडतील?’; केशव प्रसाद मौर्य यांचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा | Navarashtra (नवराष्ट्र)

0
21
Political News | ‘महाराष्ट्रात न्याययात्रा पोहोचेपर्यंत किती नेते पक्ष सोडतील?’; केशव प्रसाद मौर्य यांचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा | Navarashtra (नवराष्ट्र)


‘महाराष्ट्रात न्याययात्रा पोहोचेपर्यंत किती नेते पक्ष सोडतील?’; केशव प्रसाद मौर्य यांचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस पक्ष सोडून मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली.

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस पक्ष सोडून मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली असून, न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल होईपर्यंत किती नेते काँग्रेस पक्षाला ‘बाय-बाय’ करतील असा सवाल केला आहे.

त्यात त्यांनी ‘गांधी परिवाराकडून अन्याय सहन करून काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते पक्ष सोडून जात आहे. त्यांनी पक्ष सोडण्यासाठी निवडलेली वेळ’ अशी आहे की राहुल गांधी खुद न्याय यात्रेवर आहेत’, असे मौर्य यांनी म्हटले आहे. अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. सोमवारी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.






Source link