
राजस्थानमधील भरतपूरमध्ये एका हॉटेलमध्ये धर्मांतर केले जात होते. एकाच वेळी तब्बल 500 लोकांचे धर्मांतर करत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
भरतपूर : राजस्थानमधील (Rajasthan) धर्मांतराचा (conversion) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजस्थानमधील भरतपूरमध्ये (Bharatpur) एका हॉटेलमध्ये धर्मांतर केले जात होते. एकाच वेळी तब्बल 500 लोकांचे धर्मांतर करत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकराची खबर विश्व हिंदू परिषदेच्या (Vishwa Hindu Parishad) कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत हा प्रकार उघडकीस आणला आहे.
तब्बल 500 लोकांचे एकत्र धर्मांतर करण्याचा हा प्रकार भरतपूरमधील अटल बंद ठाण्याच्या परिसरात घडला. यावेळी एका हॉटेलमध्ये सर्व लोकांना बोलावून त्यांचे वेगळ्या धर्मामध्ये परिवर्तन केले जात होते. याचा सुगावा लागताच विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्ते हॉटेलमध्ये दाखल झाले. या कार्यकर्त्यांमध्ये आणि धर्मांतर कार्यक्रम आयोजकांमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी पोलीस आल्यानंतर हॉटेलमध्ये जमलेल्या काही लोकांनी पळ देखील काढला.









